शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

एकही नवा जिल्हा होणार नाही!

By admin | Updated: August 18, 2015 02:18 IST

भाजपा शिवसेना सरकार २२ जिल्ह्णांची निर्मिती करणार अशा बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत, नजीकच्या काळात एकही नवीन जिल्हा निर्माण होणार नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबईभाजपा शिवसेना सरकार २२ जिल्ह्णांची निर्मिती करणार अशा बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत, नजीकच्या काळात एकही नवीन जिल्हा निर्माण होणार नाही. तसे करणे आर्थिक दृष्टीने परवडणारेही नाही असे आता समोर आले आहे. त्यामुळे जिल्हानिर्मितीची बातमी ही केवळ चहाच्या पेल्यातले वादळ ठरली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे या दोघांनीही असा कोणताही प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट केले आहे. २२ जिल्हे आणि ५७ तालुके निर्माण करण्यात येतील अशी बातमी कोठून आली याचा वरिष्ठ पातळीवर शोध घेतला गेला आहे. राज्यमंत्री दादा भुसे आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्णातल्या काही तालुक्यांची निर्मिती करण्यावर चर्चा झाली. आघाडी सरकारच्या काळात २२ जिल्हे व ५७ तालुक्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव आले होते. त्या आधारावर राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आणि पहाता पहाता कागदावरच सरकारने २२ जिल्हे तयार करुन टाकले. अशी माहिती खात्री न करता माध्यमांना देण्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.याबाबत लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २२ जिल्हे करण्याचा कोणताही विचारच नाही. आर्थिक दृष्टीने ते परवडणारे नाही. त्यासाठीचा अभ्यासही झालेला नाही. मात्र काही तालुक्यांच्या निर्मितीबद्दल विचार चालू आहे. पण त्याचाही कोणता प्रस्ताव आलेला नाही.राज्यात आजच ३० आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. केंद्राने एकदम एवढे अधिकारी देण्यास नकार दिला आहे,असे सांगून मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय म्हणाले, आपल्याकडे केडर पोस्ट तयार करुन या जागा भरण्याचा प्रस्ताव येत्या काही महिन्यात मंजूर होईल त्यामुळे राज्यातल्या किमान २० ते २५ अधिकाऱ्यांना आयएएस करता येईल. जिल्हा निर्मिती केली तर मोठ्या प्रमाणावर पदे भरावी लागतील. आपल्याला तर अशी कोणतीच माहिती नाही असेही क्षत्रीय म्हणाले.राज्यमंत्र्यांना तसा अधिकारच नाही - खडसेस्पष्ट बोलण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे असेलेल्या राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अधिकारात जिल्हा किंवा तालुका निर्मितीचा विषयच येत नाही. मात्र महसूल राज्यमंत्री बोलले त्यामुळे कदाचित त्याला वजन आले असावे असा चिमटाही खडसे यांनी काढला. ते म्हणाले, गेल्या आठ महिन्यात तसा कोणताही प्रस्ताव नाही, मागणीही नाही. मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव नेण्याचा अधिकार महसूल विभागाचा आहे. असे विभाजन करणे आजतरी आमच्या सरकारला आर्थिक आणि राजकीय दृष्टीने परवडणारे नाही. अहमदनगर, पुणे असे काही जिल्हे आहेत ज्यांचे विभाजन करण्याची गरज आहे पण त्याचाही अद्याप कोणता प्रस्ताव नाही.