शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

सर्वदूर पावसाचा जोर वाढणार

By admin | Updated: June 28, 2016 03:54 IST

कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

पुणे : कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोर धरलेला पाऊस येत्या तीन दिवसांत राज्यात सर्वदूर धो-धो पडेल, अशी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.संपूर्ण राज्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) व्यापले असले तरी पावसाची ‘जोर’धार फक्त कोकणातच आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यातही दमदार पाऊस होत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही अपवाद वगळता अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे सर्व जण दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. या भागांमध्ये बाष्पयुक्त वारे खेचण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी हवेची आवश्यक स्थितीच निर्माण झालेली नाही. मात्र बंगालच्या उपसागरात ओडिशा व आंध्र प्रदेश राज्यांच्या किनारपट्टीजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला आहे. तो पुढील २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता असल्याने कोकणासह उर्वरित राज्यात पावसाचा जोर वाढेल, असे हवामानशास्त्र विभागाने कळविले आहे. कोकणात मुसळधार कायम असून रत्नागिरी पाठोपाठ मुरूड येथे १५०, हर्णे १४०, वेंगुर्ला १२०, रोहा ११०, मालवण येथे ९०, दापोली, वैभववाडी येथे ८०, कणकवली, सावंतवाडी, पाली, ठाणे येथे ७०, अलिबाग, गुहागर, श्रीवर्धन येथे ६०, अंबरनाथ, भिरा, कल्याण येथे ५०, डहाणू, देवगड, महाड, माथेरान, राजापूर, उल्हासनगर येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. भिवंडी, चिपळूण, मुंबई, पोलादपूर येथे ३०, कर्जत, पालघर येथे २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे ६०, महाबळेश्वरमध्ये ४०, इगतपुरी, राधानगरी, शाहूवाडी येथे २०, कवठेमहांकाळ, पन्हाळा, पुणे येथे १० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यात माहूर येथे ४०, हिंगोली येथे १०, विदर्भात ब्रह्मपुरी येथे ३०, चंद्रपूर, अमरावती, नागपूर येथे १० मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)