शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

प्रचारामध्ये ‘मिठी’ गाजणार

By admin | Updated: January 19, 2017 03:12 IST

मुंबईला महाप्रलयाच्या खाईत ढकलणारी मिठी नदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.

मुंबई : मुंबईला महाप्रलयाच्या खाईत ढकलणारी मिठी नदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. विशेषत: मिठी नदीचा बराचसा भाग महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डमधून वाहत असून, येथील प्रभाग क्रमांक १६२, १६६ आणि १६८ मधील राजकीय पक्षांचे उमेदवार या मुद्द्यांवरून एकमेकांवर कुरघोडी करू पाहणार आहेत. मिठीच्या मुद्द्याव्यतिरिक्त झोपड्यांचे पुनर्वसन आणि छोट्या रस्त्यांची कामे हे विषयही उमेदवारांपुढील आव्हान असून, या विषयांना राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार कसे हाताळतात? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई महापालिकेने यापूर्वी मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम केले आहे. मिठी खोल आणि रुंद झाली असली, तरी मिठीलगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासन फारसे काही यशस्वी ठरलेले नाही. शिवाय मरोळ येथून सीएसटी-कलिना रोडपर्यंत वाहणाऱ्या मिठी नदीत लगतच्या कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. हे रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यासह लगतच्या भंगारविक्रेत्यांनी नदीच्या काठाला अक्षरश: डम्पिंग ग्राऊंड बनवले आहे. सीएसटी-कलिना रोड येथे हे चित्र प्रामुख्याने नजरेस येत असून, लाल बहादूर शास्त्री मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करताना लागणाऱ्या पुलालगतही हे चित्र प्रामुख्याने पाहण्यास मिळत आहे.विशेषत: सीएसटी-कलिना रोड आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील मिठीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत मागील पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे अपेक्षित होते. मात्र, एखाद दुसरे आंदोलन वगळता लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे क्रांतिनगर, संदेशनगर, कलिना, सीएसटी येथे मिठीलगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मिठी नदीच्या प्रदूषणाच्या दुर्गंधीचा अतोनात त्रास होत आहे. यावर महापालिकेने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी, ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६१, १६६ आणि १६८ मध्ये राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांकडून उर्वरित मुद्द्यांसह मिठी नदीच्या मुद्द्यालाही हात घातला जाणार आहे. एकंदर ‘एल’ वॉर्डमधील विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कुर्ला-अंधेरी रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न, नाल्यांच्या साफसफाईसह शौचालयाचा प्रश्न; अशा अनेक प्रश्नांसह मिठी नदीचा मुद्दाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळीचा ठरणार असून, या सर्व पार्श्वभूमीवर मतदार आपले पारडे कोणाकडे झुकवतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)>कित्येक वर्षांपासूनअस्वच्छता कायम‘एल’ आणि ‘एच-ईस्ट’ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर मिठी नदी आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गासह सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून सांताक्रूझ पूर्वेला जाताना मिठीलगतच्या प्रदूषणाकडे सहज लक्ष वेधले जाते. नदीलगत भंगार साहित्य जमा झाले असून, येथील पाणी रसायनमिश्रित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरातील अस्वच्छता अशीच आहे. परिणामी याचा लगतच्या रहिवाशांना त्रास होत असून, महापालिकेसह लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या साफसफाईची कामे महापालिका हाती घेते. मात्र पावसाळा संपला तरी ही कामे पुर्ण होत नाहीत. विशेषत: मिठी नदीतून काढण्यात आलेला गाळ कुठे टाकण्यात आला? अशा आशायाचे प्रश्न यापूर्वीच उपस्थित करण्यात आले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे स्थानिकांचे मत आहे.