शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

प्रचारामध्ये ‘मिठी’ गाजणार

By admin | Updated: January 19, 2017 03:12 IST

मुंबईला महाप्रलयाच्या खाईत ढकलणारी मिठी नदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.

मुंबई : मुंबईला महाप्रलयाच्या खाईत ढकलणारी मिठी नदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. विशेषत: मिठी नदीचा बराचसा भाग महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डमधून वाहत असून, येथील प्रभाग क्रमांक १६२, १६६ आणि १६८ मधील राजकीय पक्षांचे उमेदवार या मुद्द्यांवरून एकमेकांवर कुरघोडी करू पाहणार आहेत. मिठीच्या मुद्द्याव्यतिरिक्त झोपड्यांचे पुनर्वसन आणि छोट्या रस्त्यांची कामे हे विषयही उमेदवारांपुढील आव्हान असून, या विषयांना राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार कसे हाताळतात? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई महापालिकेने यापूर्वी मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम केले आहे. मिठी खोल आणि रुंद झाली असली, तरी मिठीलगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासन फारसे काही यशस्वी ठरलेले नाही. शिवाय मरोळ येथून सीएसटी-कलिना रोडपर्यंत वाहणाऱ्या मिठी नदीत लगतच्या कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. हे रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यासह लगतच्या भंगारविक्रेत्यांनी नदीच्या काठाला अक्षरश: डम्पिंग ग्राऊंड बनवले आहे. सीएसटी-कलिना रोड येथे हे चित्र प्रामुख्याने नजरेस येत असून, लाल बहादूर शास्त्री मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करताना लागणाऱ्या पुलालगतही हे चित्र प्रामुख्याने पाहण्यास मिळत आहे.विशेषत: सीएसटी-कलिना रोड आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील मिठीच्या नदीच्या प्रदूषणाबाबत मागील पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे अपेक्षित होते. मात्र, एखाद दुसरे आंदोलन वगळता लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे क्रांतिनगर, संदेशनगर, कलिना, सीएसटी येथे मिठीलगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मिठी नदीच्या प्रदूषणाच्या दुर्गंधीचा अतोनात त्रास होत आहे. यावर महापालिकेने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी, ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६१, १६६ आणि १६८ मध्ये राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारांकडून उर्वरित मुद्द्यांसह मिठी नदीच्या मुद्द्यालाही हात घातला जाणार आहे. एकंदर ‘एल’ वॉर्डमधील विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कुर्ला-अंधेरी रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न, नाल्यांच्या साफसफाईसह शौचालयाचा प्रश्न; अशा अनेक प्रश्नांसह मिठी नदीचा मुद्दाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळीचा ठरणार असून, या सर्व पार्श्वभूमीवर मतदार आपले पारडे कोणाकडे झुकवतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)>कित्येक वर्षांपासूनअस्वच्छता कायम‘एल’ आणि ‘एच-ईस्ट’ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर मिठी नदी आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गासह सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून सांताक्रूझ पूर्वेला जाताना मिठीलगतच्या प्रदूषणाकडे सहज लक्ष वेधले जाते. नदीलगत भंगार साहित्य जमा झाले असून, येथील पाणी रसायनमिश्रित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परिसरातील अस्वच्छता अशीच आहे. परिणामी याचा लगतच्या रहिवाशांना त्रास होत असून, महापालिकेसह लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या साफसफाईची कामे महापालिका हाती घेते. मात्र पावसाळा संपला तरी ही कामे पुर्ण होत नाहीत. विशेषत: मिठी नदीतून काढण्यात आलेला गाळ कुठे टाकण्यात आला? अशा आशायाचे प्रश्न यापूर्वीच उपस्थित करण्यात आले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे स्थानिकांचे मत आहे.