शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

फाशीपर्यंत पोहोचविणारच

By admin | Updated: July 25, 2016 05:07 IST

कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा/कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डीकरांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. कोपर्डी येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली नाही, अशी टीका झाली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यांच्या दौऱ्याबाबत काहीही पूर्वकल्पना नव्हती. ते थेट पीडित कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी गेले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्रास होत आहे, अशी तक्रार मुलीच्या एका नातेवाईकाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याबाबत विचार करू, असे ते म्हणाले.पीडित कुटुंबाच्या घराबाहेर जमलेल्या काही लोकांशीही त्यांनी संवाद साधला. मी पीडित कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून या दुर्दैवी घटनेची माहिती घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर खूप वेदना झाल्या. सरकार म्हणून सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. कुटुंबाच्या मागे सरकार उभे आहे. न्यायालयीन प्रक्रियेची मी स्वत: दररोज माहिती घेणार आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांच्यासोबत होते. (प्रतिनिधी)गुप्तवार्ता शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कोपर्डीत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पना नव्हती. कोणीतरी ‘व्हीव्हीआयपी’येऊ शकतात, एवढाच संदेश पोलिसांना देण्यात आला होता. त्यासाठी सकाळपासूनच बंदोबस्त वाढविला होता. मुख्यमंत्री दिल्लीहून विमानाने बारामतीत उतरले. तेथून वाहनाने ते साडेचार वाजता कोपर्डीत पोहोचले. वीस मिनिटे थांबून ते बारामतीकडे रवाना झाले. माध्यमिक शाळेची मागणी च्खा. छत्रपती संभाजीराजे यांनीही पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आ. कपिल पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात सातवीनंतर माध्यमिक शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणू, असे पाटील यांनी सांगितले.