शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

फाशीपर्यंत पोहोचविणारच

By admin | Updated: July 25, 2016 05:07 IST

कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा/कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डीकरांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. कोपर्डी येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली नाही, अशी टीका झाली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यांच्या दौऱ्याबाबत काहीही पूर्वकल्पना नव्हती. ते थेट पीडित कुटुंबीयांच्या घरी सांत्वनासाठी गेले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्रास होत आहे, अशी तक्रार मुलीच्या एका नातेवाईकाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याबाबत विचार करू, असे ते म्हणाले.पीडित कुटुंबाच्या घराबाहेर जमलेल्या काही लोकांशीही त्यांनी संवाद साधला. मी पीडित कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून या दुर्दैवी घटनेची माहिती घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर खूप वेदना झाल्या. सरकार म्हणून सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. कुटुंबाच्या मागे सरकार उभे आहे. न्यायालयीन प्रक्रियेची मी स्वत: दररोज माहिती घेणार आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांच्यासोबत होते. (प्रतिनिधी)गुप्तवार्ता शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कोपर्डीत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पना नव्हती. कोणीतरी ‘व्हीव्हीआयपी’येऊ शकतात, एवढाच संदेश पोलिसांना देण्यात आला होता. त्यासाठी सकाळपासूनच बंदोबस्त वाढविला होता. मुख्यमंत्री दिल्लीहून विमानाने बारामतीत उतरले. तेथून वाहनाने ते साडेचार वाजता कोपर्डीत पोहोचले. वीस मिनिटे थांबून ते बारामतीकडे रवाना झाले. माध्यमिक शाळेची मागणी च्खा. छत्रपती संभाजीराजे यांनीही पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आ. कपिल पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात सातवीनंतर माध्यमिक शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणू, असे पाटील यांनी सांगितले.