शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील ६०० ताडी दुकाने होणार बंद

By admin | Updated: November 11, 2016 05:35 IST

अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यात ताडाची झाडेच नाहीत वा नावापुरतीच झाडे आहेत, अशा जिल्ह्यांतही ताडी विक्रीची दुकाने चालविली जातात. एक हजार ताडाच्या झाडामागे एक ताडीविक्रीचा परवाना देण्याचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला हरताळ फासत रसायनांचा वापर करून नकली ताडी विकली जात होती. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यातील विविध दुकानांमधील ताडीचे नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण करण्यात आले असता, अत्यंत विषारी, मानवी शरीराला घातक असे रासायनिक घटक मिसळून ताडी तयार केली जात असल्याचे आढळले. काही ठिकाणी मूळ ताडीचा पत्ताच नव्हता. केवळ रसायनांचाच वापर करण्यात येत होता. अशी जवळपास ६०० दुकाने असल्याचे समोर आले. राज्यात एकूण १ हजार २५० ताडीविक्रीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दिलेले आहेत. लिलाव पद्धतीने ते दिले जातात. ज्यांच्या परवाना क्षेत्रात ताडाची झाडेच नाहीत, अशा दुकानांवर गंडांतर येणार आहे.