शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यातील ६०० ताडी दुकाने होणार बंद

By admin | Updated: November 11, 2016 05:35 IST

अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यात ताडाची झाडेच नाहीत वा नावापुरतीच झाडे आहेत, अशा जिल्ह्यांतही ताडी विक्रीची दुकाने चालविली जातात. एक हजार ताडाच्या झाडामागे एक ताडीविक्रीचा परवाना देण्याचे धोरण आहे. मात्र, या धोरणाला हरताळ फासत रसायनांचा वापर करून नकली ताडी विकली जात होती. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यातील विविध दुकानांमधील ताडीचे नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण करण्यात आले असता, अत्यंत विषारी, मानवी शरीराला घातक असे रासायनिक घटक मिसळून ताडी तयार केली जात असल्याचे आढळले. काही ठिकाणी मूळ ताडीचा पत्ताच नव्हता. केवळ रसायनांचाच वापर करण्यात येत होता. अशी जवळपास ६०० दुकाने असल्याचे समोर आले. राज्यात एकूण १ हजार २५० ताडीविक्रीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दिलेले आहेत. लिलाव पद्धतीने ते दिले जातात. ज्यांच्या परवाना क्षेत्रात ताडाची झाडेच नाहीत, अशा दुकानांवर गंडांतर येणार आहे.