शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वसईत होणार ३ पोलीस उपअधीक्षक कार्यालये

By admin | Updated: July 31, 2016 02:54 IST

विरार आणि नालासोपाऱ्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपअधिक्षक कार्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला

शशी करपे,

वसई- वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून विरार आणि नालासोपाऱ्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपअधिक्षक कार्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर ही कार्यालये कार्यान्वित होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.विरार, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, तुळींज, नालासोपारा, माणिकपूर, वालीव आणि वसई अशी सात पोलीस ठाणी वसईत असून एक पोलीस उपअधीक्षक आणि एक अपर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहे. पण, १८ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई तालुक्यात पोलिसांची खूपच कमतरता आहे. तालुक्याचा क्राईम रेट प्रचंड वेगाने वाढत आहे. तुळींज, विरार आणि वालीव पोलीस ठाण्यात तर दरवर्षी एक हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यामुळे ठाणी वाढल्यास पोलीसांच्या संख्येत वाढ होऊन गुन्हेगारी रोखण्यास ते सक्षम होतील. त्याचबरोबर विरार आणि नालासोपारा येथे दोन उपअधीक्षक कार्यालय झाल्यास पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश बसेल, यासाठी पोलीसखात्याकडून दोन उपअधीक्षक कार्यालया सोबत आचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवी आणि विरार पश्चिम अशी सहा पोलीस ठाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकार अनुकूल असून सरकारने विरार आणि नालासोपारा अशी दोन उपअधीक्षक कार्यालये तातडीने सुरुकरण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्थेचा पडणारा ताण कमी करण्यासाठीच दोनकार्यालये तातडीने सुरु करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित उपविभागीय कार्यालयांसाठी जागा, हद्द निश्चिती इत्यादी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणेकडून वेगवान प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.ही कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर नव्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आताआचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवीआणि विरार पश्चिम अशी नवी पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. यापैकी मांडवी, आचोळेयआणि कामण ही तीन पोलीस ठाणी तातडीने कार्यान्वित करण्याचा पय्रत्न असणार आहे. >असे झाले होते पोलीस ठाण्यांचे विभाजनयाआधी विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून अर्नाळा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच माणिकपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून वालीव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्या नंतर तुळींज नालासोपारा पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळींज पोलीस ठाणे तयार करण्यात आले.