शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB साठी 'सुवर्ण' क्षण! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
3
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
4
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
5
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
6
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
7
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
8
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
9
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
10
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
11
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
12
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
13
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
14
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
15
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
16
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
17
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय
18
महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना
19
जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग
20
फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे

वसईत होणार ३ पोलीस उपअधीक्षक कार्यालये

By admin | Updated: July 31, 2016 02:54 IST

विरार आणि नालासोपाऱ्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपअधिक्षक कार्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला

शशी करपे,

वसई- वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून विरार आणि नालासोपाऱ्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस उपअधिक्षक कार्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर ही कार्यालये कार्यान्वित होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.विरार, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, तुळींज, नालासोपारा, माणिकपूर, वालीव आणि वसई अशी सात पोलीस ठाणी वसईत असून एक पोलीस उपअधीक्षक आणि एक अपर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहे. पण, १८ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई तालुक्यात पोलिसांची खूपच कमतरता आहे. तालुक्याचा क्राईम रेट प्रचंड वेगाने वाढत आहे. तुळींज, विरार आणि वालीव पोलीस ठाण्यात तर दरवर्षी एक हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यामुळे ठाणी वाढल्यास पोलीसांच्या संख्येत वाढ होऊन गुन्हेगारी रोखण्यास ते सक्षम होतील. त्याचबरोबर विरार आणि नालासोपारा येथे दोन उपअधीक्षक कार्यालय झाल्यास पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश बसेल, यासाठी पोलीसखात्याकडून दोन उपअधीक्षक कार्यालया सोबत आचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवी आणि विरार पश्चिम अशी सहा पोलीस ठाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकार अनुकूल असून सरकारने विरार आणि नालासोपारा अशी दोन उपअधीक्षक कार्यालये तातडीने सुरुकरण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्थेचा पडणारा ताण कमी करण्यासाठीच दोनकार्यालये तातडीने सुरु करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित उपविभागीय कार्यालयांसाठी जागा, हद्द निश्चिती इत्यादी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणेकडून वेगवान प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.ही कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर नव्या पोलीस ठाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आताआचोळे, पेल्हार, जुचंद्र, कामण, मांडवीआणि विरार पश्चिम अशी नवी पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. यापैकी मांडवी, आचोळेयआणि कामण ही तीन पोलीस ठाणी तातडीने कार्यान्वित करण्याचा पय्रत्न असणार आहे. >असे झाले होते पोलीस ठाण्यांचे विभाजनयाआधी विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून अर्नाळा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच माणिकपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून वालीव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्या नंतर तुळींज नालासोपारा पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळींज पोलीस ठाणे तयार करण्यात आले.