शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याने भार्इंदरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी

By admin | Updated: August 1, 2016 03:26 IST

पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे.

भार्इंदर : पालिकेने केलेल्या नालेसफाईचे पितळ शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने उघड केले आहे. महामार्ग परिसर पाण्यात गेला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पालिकेच्या आपत्कालीन कक्ष, अधिकाऱ्यांशी नागरिकांनी वारंवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्हता. यामुळे त्यांच्या संतापात भर पडली. हायवे परिसरातील मुन्शी कम्पाउंड, काशीगावातील मीनाक्षीनगर, वेस्टर्न पार्क, वेस्टर्न हॉटेल, ग्रीन व्हिलेज आदी झंकार नाल्याजवळील परिसरात दोन ते तीन फूट पाणी होते. नागरिकांचा रविवार घरातील पाण्यातच काढण्यात गेला. अनेक इमारतींमध्येही पाणी शिरल्याने घरातील धान्याचे नुकसान झाले. यांच्यासाठी नगरसेविका दक्षता ठाकूर व समाजसेवक राजेंद्र ठाकूर यांनी जेवणाची सोय केली. प्रभाग समिती-६चे अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी काही ठिकाणी भेट दिली. परंतु, तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास तेही असमर्थ ठरले. मीरारोडमध्ये पूरसदृश परिस्थिती मुसळधार पावसामुळे मीरा रोड व काशिमीरा भागात पूरसृदश परिस्थिती निर्माण झाली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून पाण्याचा लोंढा आल्याने अनेक भाग पाण्याखाली गेला. शिवाय, नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेले अतिक्रमण व मातीच्या भरावाकडे पालिका व महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मीरा गावठाण, लक्ष्मीबाग, माशाचापाडा, काशीगाव येथे पाणीच पाणी होते. माशाचापाडा भागात तर पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अग्निशमन दलाचे जवान तळ ठोकून होते. पेट्रोलपंप पाण्याखाली गेल्याने तो बंद होता. सिल्व्हर सरिता-विनयनगर, मुन्शी कम्पाउंड, मीराधाम, कृष्णस्थळ प्लेझंट पार्क, विजय पार्क, जांगीड इस्टेट, हेतल पार्क परिसर पाण्याखाली होता. हाटकेश भागातही पाणी साचले होते. शांती विद्यानगरी, एव्हरग्रीन सिटी, हरिया पार्क, ग्रीन कोर्ट क्लब येथे भरपूर पाणी होते, तर जुन्या इमारतींमध्ये तर कमरेभर पाणी साचले होते. पाणी उपसण्यासाठी पालिकेने पंप लावले होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे पंपाचा फारसा उपयोग झाला नाही.