शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘टोलबंदी’वरून अजूनटोलवाटोलवीच

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली

मुंबई : टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली. या टोलनाक्यांमधून एसटीबरोबरच सर्वच वाहनांना टोल टॅक्स माफ करण्यात आला. मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा अद्याप कागदावरच असून, कुठलाही शासन निर्णय झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही या टोल टॅक्सबाबत टोलवाटोलवीच सुरू असून एसटीला त्याचा भुर्दंड पडतच आहे. एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात असून, याची ओरड महामंडळाकडून सातत्याने केली जात आहे. सवलती, डिझेलचा वाढत जाणारा खर्च, घटत चाललेले प्रवासी आणि अन्य काही कारणांमुळे एसटीवरील आर्थिक संकट वाढतच जात आहे. त्याचप्रमाणे महामंडळासमोर सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे ती टोल टॅक्सची. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेल्या या सेवेला लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल टॅक्सला सामोरे जावे लागत आहे. या टोल टॅक्समुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळ त्याच्या ओझ्याखाली दबत चालले आहे. महामंडळाच्या बसेसना जवळपास २२२ टोलनाक्यांतून जावे लागते. त्याचा मोठा फटका मंडळाला बसतो. गेल्या सहा वर्षांत तर महामंडळाने भरलेला टोल हा वाढतच गेला आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सपोटी भरण्यात आले होते. २0१३-२0१४ साली हाच आकडा जवळपास १३२ कोटी रुपये एवढा झाला. त्यामुळे टोलनाक्यातून वगळण्यात यावे अशी मागणी एसटी महामंडळाकडून केली जात होती. तर अनेक राजकीय पक्षांकडूनही टोल टॅक्स माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारकडून ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय झाला. यात ३४ टोलनाके हे एमएसआरडीचे तर उर्वरित १० टोलनाके हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होते. अन्य वाहनांबरोबरच एसटीलाही या टोलनाक्यांमधून माफ करण्यात आले होते. यामुळे एसटीची वर्षाला जवळपास ४0 कोटी रुपयांची बचत होणार होती. त्यानंतरही या टोलनाक्यांमधून सूट देण्यात आल्याची घोषणा अनेकदा सरकारकडून करण्यात आली. मात्र याबाबत शासन निर्णयच जाहीर झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)