शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टोलबंदी’वरून अजूनटोलवाटोलवीच

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली

मुंबई : टोल टॅक्स माफ करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे वारंवार केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली. या टोलनाक्यांमधून एसटीबरोबरच सर्वच वाहनांना टोल टॅक्स माफ करण्यात आला. मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा अद्याप कागदावरच असून, कुठलाही शासन निर्णय झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही या टोल टॅक्सबाबत टोलवाटोलवीच सुरू असून एसटीला त्याचा भुर्दंड पडतच आहे. एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात असून, याची ओरड महामंडळाकडून सातत्याने केली जात आहे. सवलती, डिझेलचा वाढत जाणारा खर्च, घटत चाललेले प्रवासी आणि अन्य काही कारणांमुळे एसटीवरील आर्थिक संकट वाढतच जात आहे. त्याचप्रमाणे महामंडळासमोर सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे ती टोल टॅक्सची. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेल्या या सेवेला लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल टॅक्सला सामोरे जावे लागत आहे. या टोल टॅक्समुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळ त्याच्या ओझ्याखाली दबत चालले आहे. महामंडळाच्या बसेसना जवळपास २२२ टोलनाक्यांतून जावे लागते. त्याचा मोठा फटका मंडळाला बसतो. गेल्या सहा वर्षांत तर महामंडळाने भरलेला टोल हा वाढतच गेला आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सपोटी भरण्यात आले होते. २0१३-२0१४ साली हाच आकडा जवळपास १३२ कोटी रुपये एवढा झाला. त्यामुळे टोलनाक्यातून वगळण्यात यावे अशी मागणी एसटी महामंडळाकडून केली जात होती. तर अनेक राजकीय पक्षांकडूनही टोल टॅक्स माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारकडून ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय झाला. यात ३४ टोलनाके हे एमएसआरडीचे तर उर्वरित १० टोलनाके हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होते. अन्य वाहनांबरोबरच एसटीलाही या टोलनाक्यांमधून माफ करण्यात आले होते. यामुळे एसटीची वर्षाला जवळपास ४0 कोटी रुपयांची बचत होणार होती. त्यानंतरही या टोलनाक्यांमधून सूट देण्यात आल्याची घोषणा अनेकदा सरकारकडून करण्यात आली. मात्र याबाबत शासन निर्णयच जाहीर झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)