शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

By admin | Updated: March 29, 2016 01:20 IST

मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला

- नजीर शेख,  औरंगाबादमराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये व राजकीय वर्तुळात वेगळ््या राज्याची चर्चा नाही; परंतु मराठवाड्याला विकासात डावलल्याची भावना आहे. दुसरीकडे बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, म्हणून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. फाजल अली कमिशनने वेगळ््या विदर्भाच्या मागणीची शिफारस केली आहे. मात्र, मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे, अशी कोणतीही शिफारस नाही. मराठी भाषिकांचे एकच राज्य व्हावे या हेतूने नागपूर करार झाला. आता त्याची अंमलबजावणी किती झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. स्वतंत्र विदर्भची भूमिका मांडणारे नासिकराव तिरपुडे, जांबूवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित यांना ठसा उमटविता आला नाही. तर स्वतंत्र राज्याच्या विषयावर मराठवाड्यातील नेते बोलत नाहीत, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार, असे समितीचे बेळगावचे आ. संभाजी पाटील म्हणाले. कर्नाटकमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दुय्यम नागरिकाचे जिणे जगत आहोत. येथे प्रत्येक शाळा कानडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र एक राहिला तर महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीला महत्त्व आहे, असे बीदरचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव राठोड यांनी सांगितले.आमच्याप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्याचीही लोकभावना असू शकते. मात्र, सीमा भागातील नागरिकांचा लढा हा संस्कृती आणि भाषेचा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाच्या मुद्द्यावर आहे. दोन्ही विभागांचा विकास झाल्यास त्यांची मागणी पुढे जाणार नाही, असे मत समितीचे बेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.