शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

By admin | Updated: March 29, 2016 01:20 IST

मराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला

- नजीर शेख,  औरंगाबादमराठी भाषिकांच्या राज्यासाठी मोठा संघर्ष झाला. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. महाराष्ट्र एकसंध राहावे, शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग राज्यात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये व राजकीय वर्तुळात वेगळ््या राज्याची चर्चा नाही; परंतु मराठवाड्याला विकासात डावलल्याची भावना आहे. दुसरीकडे बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, म्हणून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. फाजल अली कमिशनने वेगळ््या विदर्भाच्या मागणीची शिफारस केली आहे. मात्र, मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे, अशी कोणतीही शिफारस नाही. मराठी भाषिकांचे एकच राज्य व्हावे या हेतूने नागपूर करार झाला. आता त्याची अंमलबजावणी किती झाली, हा अभ्यासाचा विषय आहे. स्वतंत्र विदर्भची भूमिका मांडणारे नासिकराव तिरपुडे, जांबूवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित यांना ठसा उमटविता आला नाही. तर स्वतंत्र राज्याच्या विषयावर मराठवाड्यातील नेते बोलत नाहीत, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार, असे समितीचे बेळगावचे आ. संभाजी पाटील म्हणाले. कर्नाटकमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दुय्यम नागरिकाचे जिणे जगत आहोत. येथे प्रत्येक शाळा कानडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र एक राहिला तर महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीला महत्त्व आहे, असे बीदरचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव राठोड यांनी सांगितले.आमच्याप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्याचीही लोकभावना असू शकते. मात्र, सीमा भागातील नागरिकांचा लढा हा संस्कृती आणि भाषेचा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाच्या मुद्द्यावर आहे. दोन्ही विभागांचा विकास झाल्यास त्यांची मागणी पुढे जाणार नाही, असे मत समितीचे बेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.