शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

जळगावात १६३ गावांमध्ये टंचाई

By admin | Updated: April 13, 2015 05:10 IST

उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने भूजल पातळीही खालावत आहे. परिणामी, जूनपर्यंत जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे

उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने भूजल पातळीही खालावत आहे. परिणामी, जूनपर्यंत जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या हतनूर व वाघूर या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी अनुक्रमे ८६.५० तर वाघूरमध्ये ८१.४४ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांपैकी गिरणा धरणात मात्र अतिशय कमी म्हणजे १६ टक्के पाणी आहे. एप्रिल ते जून हा टंचाईचा शेवटचा टप्पा. या टप्प्यात जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. तसेच १५०१पैकी ७०२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित आहेत. त्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावांचा समावेश आहे. यासह अमळनेर २०, भडगाव २, भुसावळ, बोदवड, पाचोरा प्रत्येकी ६, चाळीसगाव ५, चोपडा १०, धरणगाव २७, एरंडोल १२, जळगाव ७, मुक्ताईनगर ८, पारोळा, रावेर प्रत्येकी ९ आणि यावल ३ अशा १६३ गावांना पाणीटंचाईची झळ बसू शकते. १४१ गावांची भिस्त टँकरवर!अहमदनगर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांतील भूजलपातळी कमालीची खालावली आहे़ पाणीपातळी खालावत असल्याने टँकरची संख्या वाढत असून, जिल्ह्यातील १४१ गावे टँकरवर अवलंबून आहेत़ उन्हं वाढू लागल्याने पाणीसाठ्यात घट होऊन सध्या जिल्ह्यात अवघा १८ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे जिल्ह्याला येत्या मे व जूनमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़ दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टँकरने शंभरी पार केली़ सध्या १९१ टँकर्सद्वारे १४१ गावे आणि ५९१ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे़ गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील टँकरची संख्या ३६९ होती़ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहता तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे़ त्यामुळे या सात तालुक्यांना येत्या मेमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ जिल्ह्यात १२ प्रकल्प आहेत़ मुळा व भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तने सोडण्यात आली़ सध्या जिल्ह्यात एकूण १८ हजार ५०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे़ मुळा धरणाने तळ गाठल्याने या धरणातून आवर्तन सोडणे अशक्य असल्याने लाभक्षेत्रातील तालुक्यांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे़