शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात १६३ गावांमध्ये टंचाई

By admin | Updated: April 13, 2015 05:10 IST

उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने भूजल पातळीही खालावत आहे. परिणामी, जूनपर्यंत जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे

उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने भूजल पातळीही खालावत आहे. परिणामी, जूनपर्यंत जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या हतनूर व वाघूर या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी अनुक्रमे ८६.५० तर वाघूरमध्ये ८१.४४ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांपैकी गिरणा धरणात मात्र अतिशय कमी म्हणजे १६ टक्के पाणी आहे. एप्रिल ते जून हा टंचाईचा शेवटचा टप्पा. या टप्प्यात जिल्ह्यातील १६३ गावांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. तसेच १५०१पैकी ७०२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित आहेत. त्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ३३ गावांचा समावेश आहे. यासह अमळनेर २०, भडगाव २, भुसावळ, बोदवड, पाचोरा प्रत्येकी ६, चाळीसगाव ५, चोपडा १०, धरणगाव २७, एरंडोल १२, जळगाव ७, मुक्ताईनगर ८, पारोळा, रावेर प्रत्येकी ९ आणि यावल ३ अशा १६३ गावांना पाणीटंचाईची झळ बसू शकते. १४१ गावांची भिस्त टँकरवर!अहमदनगर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांतील भूजलपातळी कमालीची खालावली आहे़ पाणीपातळी खालावत असल्याने टँकरची संख्या वाढत असून, जिल्ह्यातील १४१ गावे टँकरवर अवलंबून आहेत़ उन्हं वाढू लागल्याने पाणीसाठ्यात घट होऊन सध्या जिल्ह्यात अवघा १८ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे जिल्ह्याला येत्या मे व जूनमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़ दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टँकरने शंभरी पार केली़ सध्या १९१ टँकर्सद्वारे १४१ गावे आणि ५९१ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे़ गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील टँकरची संख्या ३६९ होती़ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहता तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे़ त्यामुळे या सात तालुक्यांना येत्या मेमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ जिल्ह्यात १२ प्रकल्प आहेत़ मुळा व भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तने सोडण्यात आली़ सध्या जिल्ह्यात एकूण १८ हजार ५०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे़ मुळा धरणाने तळ गाठल्याने या धरणातून आवर्तन सोडणे अशक्य असल्याने लाभक्षेत्रातील तालुक्यांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे़