शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

देशात खरंच लोकशाही आहे? - ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:42 IST

जो कोणी पंतप्रधान असेल, त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय? लोकांच्या मताला

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो कोणी पंतप्रधान असेल, त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय? लोकांच्या मताला आणि म्हणण्याला काही किंमत आहे की नाही? असे सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीकडे उंगुलीनिर्देश केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे सगळ्याचे केंद्रीकरण करायचंय की विकेंद्रीकरण? शेवटी ज्याच्या हाती काठी तो गुरं हाकी, हीच जर का राज्यपद्धती असेल तर राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी पंचायत राजच्या माध्यमातून खालपर्यंत ही स्वायत्तता दिली होती. आज मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी ही स्वायत्तता काढून घेऊन सर्व काही केंद्राच्या हाती ठेवण्याचा सपाटा चालू ठेवला आहे. जो कोणी पंतप्रधान असेल, त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय, असा सवालही त्यांनी केला.जीएसटी लागू करण्याबाबत ते म्हणाले, सगळा गोंधळ आहे. हा गोंधळ नुसता उगी राहून पाहण्यासारखा नाही. आता लोकांनीच निर्णय करावा की हे सहन करावं की लढावं. पाहा, गुजरातमध्ये छोटे व्यापारी जीएसटीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना मार खावा लागला. नोटाबंदीनंतर साधारणत: १५ लाख लोकांचा रोजगार गेल्या चार महिन्यांत गेला. नोकऱ्या गमवाव्या लागल्या. म्हणजे ६० लाख कुटुंबियांना त्याचा फटका बसला. नोटाबंदीमुळे जर का त्या पंधरा लाख लोकांना नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.