शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक विचारांतूनच मन:शांती मिळते

By admin | Updated: April 27, 2015 03:50 IST

आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला

डोंबिवली : आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला तरी मनात मात्र अशांती आहे. मन:शांतीसाठी प्रयत्न केले जातात. पण, आध्यात्मिक विचारांतूनच शांतता मिळते, असे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले.माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तीन दिवसांचा जीवनदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होेता. त्याच्या समारोप प्रसंगी प्रतिभा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर देवीसिंग शेखावत, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे, आयोजक शिल्पा सिंगारे उपस्थित होते. आपण सार्वजनिक कार्यक्रमांना फारसे जात नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, जीवनात अनेक प्रसंग येतात. संकटांचा सामना करावा लागतो. मनाची शांती मिळविण्यासाठी अध्यात्म हाच आधार आहे. यासाठीच अशा कार्यक्रमांची गरज आहे. माणसाने तामसी वृत्तीचा त्याग केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे. आपल्या देशात संतांनी खूप त्याग केला, कष्ट केले म्हणूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जगात सर्वच देशांत साधू-संत आहेत. मात्र, आपल्या देशात सर्वात जास्त संत होऊन गेले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान स्वामी गोविंददेव गिरी यांचे तीन दिवस ‘जीवनदर्शन’ या विषयावर मागदर्शन झाले.