शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक विचारांतूनच मन:शांती मिळते

By admin | Updated: April 27, 2015 03:50 IST

आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला

डोंबिवली : आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला तरी मनात मात्र अशांती आहे. मन:शांतीसाठी प्रयत्न केले जातात. पण, आध्यात्मिक विचारांतूनच शांतता मिळते, असे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले.माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तीन दिवसांचा जीवनदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होेता. त्याच्या समारोप प्रसंगी प्रतिभा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर देवीसिंग शेखावत, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे, आयोजक शिल्पा सिंगारे उपस्थित होते. आपण सार्वजनिक कार्यक्रमांना फारसे जात नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, जीवनात अनेक प्रसंग येतात. संकटांचा सामना करावा लागतो. मनाची शांती मिळविण्यासाठी अध्यात्म हाच आधार आहे. यासाठीच अशा कार्यक्रमांची गरज आहे. माणसाने तामसी वृत्तीचा त्याग केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे. आपल्या देशात संतांनी खूप त्याग केला, कष्ट केले म्हणूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जगात सर्वच देशांत साधू-संत आहेत. मात्र, आपल्या देशात सर्वात जास्त संत होऊन गेले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान स्वामी गोविंददेव गिरी यांचे तीन दिवस ‘जीवनदर्शन’ या विषयावर मागदर्शन झाले.