शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
2
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
4
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
5
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
6
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
7
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
9
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
10
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
11
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
12
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
13
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
14
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
15
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
16
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
17
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
18
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
19
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
20
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली

आध्यात्मिक विचारांतूनच मन:शांती मिळते

By admin | Updated: April 27, 2015 03:50 IST

आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला

डोंबिवली : आजकाल गावांतून, शहरांतून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. मोठमोठी हॉटेल्स, इमारती उभ्या राहत आहेत. सर्वत्र विकास होत असला तरी मनात मात्र अशांती आहे. मन:शांतीसाठी प्रयत्न केले जातात. पण, आध्यात्मिक विचारांतूनच शांतता मिळते, असे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले.माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तीन दिवसांचा जीवनदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होेता. त्याच्या समारोप प्रसंगी प्रतिभा पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर देवीसिंग शेखावत, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे, आयोजक शिल्पा सिंगारे उपस्थित होते. आपण सार्वजनिक कार्यक्रमांना फारसे जात नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, जीवनात अनेक प्रसंग येतात. संकटांचा सामना करावा लागतो. मनाची शांती मिळविण्यासाठी अध्यात्म हाच आधार आहे. यासाठीच अशा कार्यक्रमांची गरज आहे. माणसाने तामसी वृत्तीचा त्याग केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे. आपल्या देशात संतांनी खूप त्याग केला, कष्ट केले म्हणूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जगात सर्वच देशांत साधू-संत आहेत. मात्र, आपल्या देशात सर्वात जास्त संत होऊन गेले, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. दरम्यान स्वामी गोविंददेव गिरी यांचे तीन दिवस ‘जीवनदर्शन’ या विषयावर मागदर्शन झाले.