शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

By admin | Updated: May 18, 2016 00:57 IST

‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही

पुणे : ‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही. असा एखादा वृक्ष रहदारीच्या रस्त्यावर पडला तर त्याचा पसारा बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची यावरून पालिकेच्या अग्निशमन दल व उद्यान विभागात वाद होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात फिरून पाहणी करून धोकादायक वृक्षांची नोंद करण्याचा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाही पालिकेकडे अशी कोणतीही नोंद नाही.सन २०१३च्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील वृक्षांची संख्या ३८ लाख आहे. यातील अनेक वृक्ष कित्येक वर्षे जुने आहेत. विविध उद्यानांमधील वृक्षांबरोबरच शहरातील भांडारकर, कर्वे, जंगलीमहाराज अशा अनेक रस्त्यांवरील वृक्षांचा त्यात समावेश आहे. मोठा वादळी पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी असे वृक्ष उन्मळून पडतात. संपूर्ण वृक्ष पडला नाही तरी त्याच्या फांद्या मोडून पडतात. गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार झाला तर त्यातून अपघात होतात. वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला वृक्ष त्वरित हलवला नाही तर त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पावसाने पडलेले असे वृक्ष हलवण्याची जबाबदारी उद्यान विभागाची की अग्निशमन विभागाची असा वाद महापालिकेत आहे. त्यातून अनेकदा कोणीच ही जबाबदारी घेत नाही. शहरातील उद्याने, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही जबाबदारी उद्यान विभागाचीच असे अग्निशमन दलाचे तर आपत्तीच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम अग्निशमन दलाचे असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. वृक्ष पडलेल्या ठिकाणाचे नागरिक फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी या दोन्ही विभागांकडून त्यांना परस्परांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तिथे तक्रार करण्यास सांगितले जाते.पडलेली झाडे उचलण्यासाठी उद्यान विभागात पूर्वी ठेकेदार नियुक्त केले जात असत. या विभागाकडे वाहनांची, मनुष्यबळाची, फांद्या कापण्यासाठीच्या अत्याधुनिक साधनांची कमतरता आहे. त्यामुळेही त्यांच्या कामावर मर्यादा येतात. विशेषत: एकाच वेळी अनेक ठिकाणी वृक्ष पडण्याच्या घटना घडतात, त्यावेळी त्यांची धावपळ होते. ठेकेदार नियुक्तीसाठी या विभागाने प्रशासनाकडे परवानगी मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पडलेल्या झाडाखाली कोणी अडकले, फांद्या पडण्यामुळे भिंत वगैरे कोसळून अपघात झाला तर अशा आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाची जबाबदारी आहे असे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात न घेता प्रत्येक वेळी कुठेही वृक्ष पडण्याची घटना घडली, किंवा एखाद्या वृक्षाची फांदी कापायची असेल तरीही त्यांच्याकडून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले जाते. पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्या प्रभागांमध्ये असा काही प्रकार झाला की लगेच अग्निशमन विभागालाच फोन करतात. ही मूळ जबाबदारी उद्यान विभागाची आहे याचाच सर्वांना विसर पडला असल्याची या विभागाची तक्रार आहे.(प्रतिनिधी)