शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

By admin | Updated: May 18, 2016 00:57 IST

‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही

पुणे : ‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही. असा एखादा वृक्ष रहदारीच्या रस्त्यावर पडला तर त्याचा पसारा बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची यावरून पालिकेच्या अग्निशमन दल व उद्यान विभागात वाद होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात फिरून पाहणी करून धोकादायक वृक्षांची नोंद करण्याचा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाही पालिकेकडे अशी कोणतीही नोंद नाही.सन २०१३च्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील वृक्षांची संख्या ३८ लाख आहे. यातील अनेक वृक्ष कित्येक वर्षे जुने आहेत. विविध उद्यानांमधील वृक्षांबरोबरच शहरातील भांडारकर, कर्वे, जंगलीमहाराज अशा अनेक रस्त्यांवरील वृक्षांचा त्यात समावेश आहे. मोठा वादळी पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी असे वृक्ष उन्मळून पडतात. संपूर्ण वृक्ष पडला नाही तरी त्याच्या फांद्या मोडून पडतात. गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार झाला तर त्यातून अपघात होतात. वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला वृक्ष त्वरित हलवला नाही तर त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पावसाने पडलेले असे वृक्ष हलवण्याची जबाबदारी उद्यान विभागाची की अग्निशमन विभागाची असा वाद महापालिकेत आहे. त्यातून अनेकदा कोणीच ही जबाबदारी घेत नाही. शहरातील उद्याने, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही जबाबदारी उद्यान विभागाचीच असे अग्निशमन दलाचे तर आपत्तीच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम अग्निशमन दलाचे असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. वृक्ष पडलेल्या ठिकाणाचे नागरिक फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी या दोन्ही विभागांकडून त्यांना परस्परांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तिथे तक्रार करण्यास सांगितले जाते.पडलेली झाडे उचलण्यासाठी उद्यान विभागात पूर्वी ठेकेदार नियुक्त केले जात असत. या विभागाकडे वाहनांची, मनुष्यबळाची, फांद्या कापण्यासाठीच्या अत्याधुनिक साधनांची कमतरता आहे. त्यामुळेही त्यांच्या कामावर मर्यादा येतात. विशेषत: एकाच वेळी अनेक ठिकाणी वृक्ष पडण्याच्या घटना घडतात, त्यावेळी त्यांची धावपळ होते. ठेकेदार नियुक्तीसाठी या विभागाने प्रशासनाकडे परवानगी मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पडलेल्या झाडाखाली कोणी अडकले, फांद्या पडण्यामुळे भिंत वगैरे कोसळून अपघात झाला तर अशा आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाची जबाबदारी आहे असे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात न घेता प्रत्येक वेळी कुठेही वृक्ष पडण्याची घटना घडली, किंवा एखाद्या वृक्षाची फांदी कापायची असेल तरीही त्यांच्याकडून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले जाते. पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्या प्रभागांमध्ये असा काही प्रकार झाला की लगेच अग्निशमन विभागालाच फोन करतात. ही मूळ जबाबदारी उद्यान विभागाची आहे याचाच सर्वांना विसर पडला असल्याची या विभागाची तक्रार आहे.(प्रतिनिधी)