शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने पडलेल्या वृक्षांना वाली नाही

By admin | Updated: May 18, 2016 00:57 IST

‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही

पुणे : ‘झाडे लावा, झाडे वाढवा’ असा घोष करणाऱ्या महापालिकेकडे पावसाने उन्मळून पडलेल्या वृक्षांची व्यवस्था लावण्यासाठी मात्र कोणतीही ठोस यंत्रणा नाही. असा एखादा वृक्ष रहदारीच्या रस्त्यावर पडला तर त्याचा पसारा बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची यावरून पालिकेच्या अग्निशमन दल व उद्यान विभागात वाद होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात फिरून पाहणी करून धोकादायक वृक्षांची नोंद करण्याचा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यंदाही पालिकेकडे अशी कोणतीही नोंद नाही.सन २०१३च्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवरील वृक्षांची संख्या ३८ लाख आहे. यातील अनेक वृक्ष कित्येक वर्षे जुने आहेत. विविध उद्यानांमधील वृक्षांबरोबरच शहरातील भांडारकर, कर्वे, जंगलीमहाराज अशा अनेक रस्त्यांवरील वृक्षांचा त्यात समावेश आहे. मोठा वादळी पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी असे वृक्ष उन्मळून पडतात. संपूर्ण वृक्ष पडला नाही तरी त्याच्या फांद्या मोडून पडतात. गर्दीच्या रस्त्यावर असा प्रकार झाला तर त्यातून अपघात होतात. वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला वृक्ष त्वरित हलवला नाही तर त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पावसाने पडलेले असे वृक्ष हलवण्याची जबाबदारी उद्यान विभागाची की अग्निशमन विभागाची असा वाद महापालिकेत आहे. त्यातून अनेकदा कोणीच ही जबाबदारी घेत नाही. शहरातील उद्याने, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही जबाबदारी उद्यान विभागाचीच असे अग्निशमन दलाचे तर आपत्तीच्या प्रसंगी धावून जाण्याचे काम अग्निशमन दलाचे असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे. वृक्ष पडलेल्या ठिकाणाचे नागरिक फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी या दोन्ही विभागांकडून त्यांना परस्परांचा दूरध्वनी क्रमांक देऊन तिथे तक्रार करण्यास सांगितले जाते.पडलेली झाडे उचलण्यासाठी उद्यान विभागात पूर्वी ठेकेदार नियुक्त केले जात असत. या विभागाकडे वाहनांची, मनुष्यबळाची, फांद्या कापण्यासाठीच्या अत्याधुनिक साधनांची कमतरता आहे. त्यामुळेही त्यांच्या कामावर मर्यादा येतात. विशेषत: एकाच वेळी अनेक ठिकाणी वृक्ष पडण्याच्या घटना घडतात, त्यावेळी त्यांची धावपळ होते. ठेकेदार नियुक्तीसाठी या विभागाने प्रशासनाकडे परवानगी मागूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पडलेल्या झाडाखाली कोणी अडकले, फांद्या पडण्यामुळे भिंत वगैरे कोसळून अपघात झाला तर अशा आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाची जबाबदारी आहे असे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात न घेता प्रत्येक वेळी कुठेही वृक्ष पडण्याची घटना घडली, किंवा एखाद्या वृक्षाची फांदी कापायची असेल तरीही त्यांच्याकडून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले जाते. पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्या प्रभागांमध्ये असा काही प्रकार झाला की लगेच अग्निशमन विभागालाच फोन करतात. ही मूळ जबाबदारी उद्यान विभागाची आहे याचाच सर्वांना विसर पडला असल्याची या विभागाची तक्रार आहे.(प्रतिनिधी)