शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

‘उजनीमध्ये तूर्तास पाणी नाहीच’

By admin | Updated: December 4, 2015 00:54 IST

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला

मुंबई : दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राधिकरणाच्या एका सदस्याचे यामध्ये हितसंबंध असल्याचे निदर्शनास आल्यावर खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे उजनीमध्ये तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही.जलस्रोत नियामक प्रशासनाने २६ आॅक्टोबर रोजी पुण्याच्या मुळशी, चासकमान, आंध्रा आणि भीमा आसखेड या धरणांतून उजनी धरणात १० टीमएमसी पाणी सोडण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांना दिला. मात्र त्याला पुण्याचे आमदार सुरेश गोरे आणि मूळशी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र खंदारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.प्राधिकरणाचे सदस्य एस.पी. सोडल यांचे यामध्ये हितसंबंध आहेत, हे माहीत असतानाही प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी का नाही निर्णय घेतला? पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत अध्यक्षही भाग घेऊ शकतात. मात्र आत्तापर्यंत ते सहभागी झाल्याचे दिसले नाही. लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने अध्यक्षांनी या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त करत अध्यक्षांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.सोडल यांनाही या निर्णयामुळे लाभ होणार असल्याचे बुधवारी न्यायालयात मान्य केले. त्यामुळे हा निर्णय कायद्याच्या कसोटीला उतरत नाही, असे म्हणत खंडपीठाने २६ आॅक्टोबरचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द केला. मात्र लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला. सगळ्यांनी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्राधिकरणापुढे सुनावणीसाठी उपस्थित राहावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने याबाबत प्राधिकरण ८ ते १० दिवसांत निर्णय घेईल, अशी आम्हाला आशा आहे, असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)