शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘उजनीमध्ये तूर्तास पाणी नाहीच’

By admin | Updated: December 4, 2015 00:54 IST

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला

मुंबई : दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूरची तहान भागवण्यासाठी जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाने पुण्याच्या चार मुख्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याचा दिलेला आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने रद्द केला. पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राधिकरणाच्या एका सदस्याचे यामध्ये हितसंबंध असल्याचे निदर्शनास आल्यावर खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे उजनीमध्ये तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही.जलस्रोत नियामक प्रशासनाने २६ आॅक्टोबर रोजी पुण्याच्या मुळशी, चासकमान, आंध्रा आणि भीमा आसखेड या धरणांतून उजनी धरणात १० टीमएमसी पाणी सोडण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांना दिला. मात्र त्याला पुण्याचे आमदार सुरेश गोरे आणि मूळशी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र खंदारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.प्राधिकरणाचे सदस्य एस.पी. सोडल यांचे यामध्ये हितसंबंध आहेत, हे माहीत असतानाही प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी का नाही निर्णय घेतला? पाणी सोडण्याच्या निर्णय प्रक्रियेत अध्यक्षही भाग घेऊ शकतात. मात्र आत्तापर्यंत ते सहभागी झाल्याचे दिसले नाही. लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने अध्यक्षांनी या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त करत अध्यक्षांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.सोडल यांनाही या निर्णयामुळे लाभ होणार असल्याचे बुधवारी न्यायालयात मान्य केले. त्यामुळे हा निर्णय कायद्याच्या कसोटीला उतरत नाही, असे म्हणत खंडपीठाने २६ आॅक्टोबरचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द केला. मात्र लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने खंडपीठाने प्राधिकरणाला १४ डिसेंबर रोजी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला. सगळ्यांनी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्राधिकरणापुढे सुनावणीसाठी उपस्थित राहावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने याबाबत प्राधिकरण ८ ते १० दिवसांत निर्णय घेईल, अशी आम्हाला आशा आहे, असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)