शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘सनातन’ विरोधात सबळ पुरावे नाहीत

By admin | Updated: October 27, 2016 02:52 IST

सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र

मुंबई : सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. त्यावर सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी, गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारशी काय पत्रव्यवहार केला, अशी विचारणा करत, सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. पनवेल आणि ठाणे येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी विजय रोकडे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर, २०१२ मध्ये राज्य सरकारने सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करून, बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. चार वर्षे उलटूनही केंद्र सरकारने या प्रस्तावावर काहीही निर्णय घेतला नाही.याबाबत केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले की, सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारकडून आलेल्या पुराव्यांची छाननी केली असता, त्या आधारावर संस्थेवर बंदी घालता येणार नाही असे लक्षात आले. त्यामुळे आणखी माहिती सादर करण्यासंदर्भात पत्र पाठवले. मात्र, राज्य सरकारने यावर काहीही प्रतिसाद दिलेला नाही, असे केंद्र सरकारने सांगितले. (प्रतिनिधी) पत्रव्यवहार दाखवाआम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये झालेला पत्रव्यवहार दाखवा. केवळ तोंडी सांगून जमणार नाही. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली पत्रे चार आठवड्यांत न्यायालयात सादर करावी,’ असे निर्देश खंडपीठाने दिले. राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत नोंद करण्यात आलेल्या संस्थेवर केंद्र सरकार कोणत्या कायद्यांतर्गत बंदी घालणार? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने उपस्थित केला.