शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

‘सनातन’ विरोधात सबळ पुरावे नाहीत

By admin | Updated: October 27, 2016 02:52 IST

सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र

मुंबई : सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून, तिच्यावर बंदी घालण्याइतपत समाधानकारक पुरावे राज्य सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. त्यावर सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी, गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारशी काय पत्रव्यवहार केला, अशी विचारणा करत, सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. पनवेल आणि ठाणे येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी विजय रोकडे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर, २०१२ मध्ये राज्य सरकारने सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करून, बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. चार वर्षे उलटूनही केंद्र सरकारने या प्रस्तावावर काहीही निर्णय घेतला नाही.याबाबत केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले की, सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारकडून आलेल्या पुराव्यांची छाननी केली असता, त्या आधारावर संस्थेवर बंदी घालता येणार नाही असे लक्षात आले. त्यामुळे आणखी माहिती सादर करण्यासंदर्भात पत्र पाठवले. मात्र, राज्य सरकारने यावर काहीही प्रतिसाद दिलेला नाही, असे केंद्र सरकारने सांगितले. (प्रतिनिधी) पत्रव्यवहार दाखवाआम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये झालेला पत्रव्यवहार दाखवा. केवळ तोंडी सांगून जमणार नाही. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली पत्रे चार आठवड्यांत न्यायालयात सादर करावी,’ असे निर्देश खंडपीठाने दिले. राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत नोंद करण्यात आलेल्या संस्थेवर केंद्र सरकार कोणत्या कायद्यांतर्गत बंदी घालणार? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने उपस्थित केला.