शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

By admin | Updated: May 30, 2016 01:38 IST

भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो.

भोर : रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा या पारंपरिक समजप्रमाणे भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो. मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीसाठी रान तयार असतानाही शेतात धूळवाफेवर पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. आकाशाकडे डोळे लावून बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतोय खरीप हंगामातील भाताच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची बांधबंधिस्ती नांगरणी उखळणी करून तरवे भाजून रान तयार करून ठेवले आहे. मंगळवारी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र निघाले खरे; पण मात्र मागील तीन महिन्यांत एक-दोन पाऊस वगळता एकही वळवाचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होण्याऐवजी आभाळाकडे डोळे लावून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने मोत्यापेक्षा श्रेष्ठ असते. जमीन तापलेली असते, हवेतही उष्मा असतो आणि अशा वेळी जर बी धूळवाफेवर पेरले (टोकणले) तर ते तरतरून उठते. पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते.रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झालेला असतो. या पावसामुळे रानांच्या मशागतीही आटोपलेल्या असतात. रान चांगल्या प्रकारे तयार असते. रोहिणी नक्षत्र निघाले की पेरणीला सुरुवात करायची, अशी गणिते ठरलेली असतात. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी बियाणे, खते घरी आणून ठेवली आहेत. धूळवाफेवरच्या पेरण्यांसह भात नाचणीचे तरवे टाकण्याचे कामही याच मुहूर्तावर करतात. घराभोवतीच्या परसबागेतही भोपळा, दोडका, कारली, राजगिरा, भेंडी, मेथी यांसारख्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची अळी घातली जातात. गौरीगणपती आणि दसऱ्याच्या सणाला या भाज्या भरपूर प्रमाणात येता. पावसाळ्यात भाज्यांची गरज घरातील परसबागेतच भागवली जाते. हे यामागचे आर्थिक गणित होते, असे आपटी गावचे माजी सरपंच व वयोवृद्ध शेतकरी जानबा पारठे यांनी सांगितले.जमीन पाण्यासाठी आसुसलेली. अशा भयानक परिस्थितीत तारखेप्रमाणे रोहिणी नक्षत्राचे आगमन झाले नाही. आणि आगमनाला आभाळात एक ढगही नाही की पावसाचा थेंबही पडलेला नाही. यंदा मॉन्सून मोठ्या प्रमाणात बसरणार, अशी भाकिते केली जातात. मात्र तो बरसणार कधी, याचा अंदाज कुणालाही आलेला नाही. मात्र, वळवाच्या पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील धूळवाफेवरच्या पेरण्या रखडल्या आहेत. (वार्ताहर)४\भोर तालुक्याची लोकसंख्या १७१७१९ असून १९८ गावे आहेत. त्यातील खरिपाची १५५ गावे असून, एकूण खातेदार ५३८९६ आहेत. तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७८०० हेक्टरवर भाताचे तर त्याखालोखाल नाचणीचे पीक ३९०० हेक्टरवर घेतले जाते. तृणधान्य १०९०० हे, कडधान्य १००० हे, गळीत धान्य ७२०० हे, सोयाबीन २५०० हेक्टरवर घेतले जाते. खरीप हंगाम २०२०० हेक्टरचा असून, तालुक्यासाठी सुमारे १६०० क्विंटल बियाणे लागते. यात बासमती, रत्नागिरी १४, कोलंबा, सोनम, कर्जत १८४, तांबडीसाळ याचा समावेश आहे.