शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

By admin | Updated: May 30, 2016 01:38 IST

भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो.

भोर : रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा या पारंपरिक समजप्रमाणे भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो. मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीसाठी रान तयार असतानाही शेतात धूळवाफेवर पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. आकाशाकडे डोळे लावून बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतोय खरीप हंगामातील भाताच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची बांधबंधिस्ती नांगरणी उखळणी करून तरवे भाजून रान तयार करून ठेवले आहे. मंगळवारी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र निघाले खरे; पण मात्र मागील तीन महिन्यांत एक-दोन पाऊस वगळता एकही वळवाचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होण्याऐवजी आभाळाकडे डोळे लावून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने मोत्यापेक्षा श्रेष्ठ असते. जमीन तापलेली असते, हवेतही उष्मा असतो आणि अशा वेळी जर बी धूळवाफेवर पेरले (टोकणले) तर ते तरतरून उठते. पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते.रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झालेला असतो. या पावसामुळे रानांच्या मशागतीही आटोपलेल्या असतात. रान चांगल्या प्रकारे तयार असते. रोहिणी नक्षत्र निघाले की पेरणीला सुरुवात करायची, अशी गणिते ठरलेली असतात. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी बियाणे, खते घरी आणून ठेवली आहेत. धूळवाफेवरच्या पेरण्यांसह भात नाचणीचे तरवे टाकण्याचे कामही याच मुहूर्तावर करतात. घराभोवतीच्या परसबागेतही भोपळा, दोडका, कारली, राजगिरा, भेंडी, मेथी यांसारख्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची अळी घातली जातात. गौरीगणपती आणि दसऱ्याच्या सणाला या भाज्या भरपूर प्रमाणात येता. पावसाळ्यात भाज्यांची गरज घरातील परसबागेतच भागवली जाते. हे यामागचे आर्थिक गणित होते, असे आपटी गावचे माजी सरपंच व वयोवृद्ध शेतकरी जानबा पारठे यांनी सांगितले.जमीन पाण्यासाठी आसुसलेली. अशा भयानक परिस्थितीत तारखेप्रमाणे रोहिणी नक्षत्राचे आगमन झाले नाही. आणि आगमनाला आभाळात एक ढगही नाही की पावसाचा थेंबही पडलेला नाही. यंदा मॉन्सून मोठ्या प्रमाणात बसरणार, अशी भाकिते केली जातात. मात्र तो बरसणार कधी, याचा अंदाज कुणालाही आलेला नाही. मात्र, वळवाच्या पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील धूळवाफेवरच्या पेरण्या रखडल्या आहेत. (वार्ताहर)४\भोर तालुक्याची लोकसंख्या १७१७१९ असून १९८ गावे आहेत. त्यातील खरिपाची १५५ गावे असून, एकूण खातेदार ५३८९६ आहेत. तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७८०० हेक्टरवर भाताचे तर त्याखालोखाल नाचणीचे पीक ३९०० हेक्टरवर घेतले जाते. तृणधान्य १०९०० हे, कडधान्य १००० हे, गळीत धान्य ७२०० हे, सोयाबीन २५०० हेक्टरवर घेतले जाते. खरीप हंगाम २०२०० हेक्टरचा असून, तालुक्यासाठी सुमारे १६०० क्विंटल बियाणे लागते. यात बासमती, रत्नागिरी १४, कोलंबा, सोनम, कर्जत १८४, तांबडीसाळ याचा समावेश आहे.