शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकाम नियमित करण्याची तरतूद नाही - हायकोर्ट

By admin | Updated: March 24, 2017 02:06 IST

राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यासंबंधी प्रस्तावित धोरणाला परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यासंबंधी प्रस्तावित धोरणाला परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारने केलेल्या अर्जावर गुरुवारपासून निकाल वाचन सुरू झाले आहे. या निकाल वाचनादरम्यान उच्च न्यायालयाने सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले बांधकाम नियमित करण्याची तरतूद कायद्यात नाही. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार याला परवानगीही नाही, असे निरीक्षण नोंदवले.राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणामध्ये आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासंदर्भात अटी घालण्यात आल्या आहेत. आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द केले असले पाहिजे किंवा अन्य ठिकाणी आरक्षण दिले असले तरच त्यावरील बांधकाम नियमित करण्यात येईल. याचाच अर्थ राज्य सरकार बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी आरक्षण बदलण्याचा घाट घालणार. राज्य सरकार बेकायदा इमारतींमधील फ्लॅट मालकांना आणखी एक कारण देणार, असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल वाचनादरम्यान नोंदवले. उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड, दिघा व अन्य ठिकाणचे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखले. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने धोरण आखल्याने राज्य सरकारला धोरण अंतिम करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने धोरण अंतिम करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी गुरुवारपासून निकाल वाचन करण्यास सुरुवात केली. सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी मालकाला संबंधित प्रशासनाकडून जमीन हस्तांतरित करून घ्यावी लागेल, असे प्रस्तावित धोरणात म्हटले आहे. यावरही उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकारी जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य असली पाहिजे, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी सामान्य नागरिकांना त्याविषयी माहिती देऊन निविदा मागवणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकार अशाप्रकारे संबंधित मालकांना जमीन हस्तांतरित करू शकत नाही,’ असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)