शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 25, 2017 07:49 IST

राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आडवाणींच्या मानगुटीवर बाबरीचे भूत बसवून सर्वोच्च न्यायालयानेच एक तगडा स्पर्धक कमी केला. त्यामुळे मुरली मनोहर जोशी हे सरसंघचालकांच्या गुप्त भेटीस जाऊन काही नवे गणित जुळवीत आहेत काय? अशी ‘गुप्त’ चर्चा उघडपणे सुरू आहे. सरसंघचालकांनी मनावर घेतले तर काहीही घडू शकते. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले. 
 
मुरली मनोहर जोशी यांनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांची ‘गुप्त’ भेट घेतली आहे. या गुप्त भेटीचे वैशिष्ट्य असे की, श्री. मुरली मनोहर संघ मुख्यालयात पोहोचण्याआधीच भेटीचे गुपित उघड झाले. या भेटीचा गवगवा झाला. तरीही जोशी व सरसंघचालकांतील भेट ‘गुप्त’च होती हे मान्य करावे लागेल. अशा वाजतगाजत झालेल्या भेटींना कुणी गुप्त वगैरे म्हणत असतील तर तो मोठाच विनोद म्हणावा लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.  
 
मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण लालकृष्ण आडवाणींप्रमाणे तेदेखील मार्गदर्शक मंडळात गुदमरले आहेत. आडवाणी किंवा जोशींसारखे नेते हे भाजपाचे पुराणपुरुष आहेत. भाजपाच्या वाटचालीत व जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. आता नव्या युगात या मंडळींना विशेष काम नाही हे मान्य केले तरी उद्याच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्यासारख्या ज्येष्ठांना काही महत्त्व उरले आहे काय, याची चाचपणी सुरू आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.  
 
नागपूरचे संघ मुख्यालय आता सत्तेचे दुसरे केंद्र बनले आहे व यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. जामा मशिदीचा इमाम हे महाशय सत्तेचे केंद्र ठरू शकतात, तर मग संघाचे मुख्यालय का असू नये? हा साधा सवाल आहे. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 
 
खरी गुप्तता  म्हणजे काय, ती कशी तंतोतंत पाळली जाते, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहासात मिळू शकतात. छत्रपती शिवरायांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतली आणि ते औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुखरूप निसटले तोपर्यंत त्याची कुणकुण तेथील कोणालाही लागली नव्हती. शिवराय सुखरूप परतल्यानंतरच औरंगजेबाला त्याचा पत्ता लागला. ही खरी गुप्तता. नेताजी सुभाषचंद्र बोस हेदेखील ज्या गोपनीय पद्धतीने ब्रिटिशांची ‘नजर’ चुकवून सुखरूप सीमापार गेले त्याला खरी गुप्तता म्हणता येईल. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर करेपर्यंत त्याची ‘खबर’ कुणालाही नव्हती. आज चित्र काय आहे? या देशात आता ‘गुप्त’ असे काही उरले आहे काय? ‘नोटाबंदी’चा पहाड कोसळणार हे वृत्त गुजरातच्या वृत्तपत्रांत आधीच प्रसिद्ध झाले होते! गुप्ततेचे संदर्भ आणि व्याख्या यापुढे बदलाव्या लागतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.