शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रंगभूमीशिवाय कुठलाही पर्याय नाही

By admin | Updated: November 11, 2014 00:44 IST

नाटक हे आव्हानात्मक असते. कलाकारांचा श्वास प्रेक्षकांना जाणवत असतो. प्रेक्षक मला पाहतात, ऐकतात, हा एका कलाकारांसाठी जिवंत अनुभव असतो.

पुणो : नाटक हे आव्हानात्मक असते. कलाकारांचा श्वास प्रेक्षकांना जाणवत असतो. प्रेक्षक मला पाहतात, ऐकतात, हा एका कलाकारांसाठी जिवंत अनुभव असतो.  आजवर अनेक चित्रपट, लघुपट केले; पण रंगभूमीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद्द संस्थेच्या वतीने घुमान येथे 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘गुरुग्रंथसाहिब’ या शीखधर्मीयांच्या पवित्र ग्रंथात समाविष्ट असलेल्या संत नामदेव यांच्या अभंगावर आधारित  ‘नामदेव बानी’ या ध्वनिचित्रफितीचा प्रकाशन सोहळा नवी पेठेतील पत्रकार भवनात झाला. विष्णुदास भावे पारितोषिक मिळाल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांचा ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. 
या प्रसंगीपं. संजीव अभ्यंकर, दीपा लागू, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संतासिंग मोखा उपस्थित होते. गुरूंच्या हस्ते सन्मान होणो ही खूप मोठी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करू बी. जे.तील डॉ. लागू यांच्याविषयीच्या आठवणींचा कप्पा पटेल यांनी उलगडला. (प्रतिनिधी)
 
4डॉ. लागू म्हणाले, की जब्बार याचे नाव डोळ्यांसमोर आले, की बी. जे. मेडिकल महाविद्यालयाचा आराखडा डोळ्यांसमोर येतो. 
4माणूस मोठा झाला, की त्याला स्वत:बद्दल बोलायचा संकोच वाटतो; पण जब्बार अशी व्यक्ती आहे जिला मी काय केले आहे ते स्वत: सांगण्याबद्दल कोणताच संकोच वाटत नाही. असा  तो ‘मस्त’ माणूस आहे. 
4आयुष्यात ज्यांच्याशी अनेक वर्षे मैत्री टिकली, त्यांमध्ये ‘जब्बार’ असा एक ‘पटेल’ आहे. एकमेकांबद्दल बोलून दाखवू नये, एवढा आदर असलेली व्यक्ती म्हणजे जब्बार, अशा शब्दांत आपल्या मित्रविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गुरू-शिष्याच्या अतूट नात्याचा भावनिक ओलावा या वेळी रसिकांनी अनुभवला.
 
जब्बार पटेल म्हणतात 
1 अनेक वर्षे मी रंगभूमीवर काम केले नाही. त्यामुळे विष्णुदास भावे पारितोषिकासाठी मी योग्य नाही, असे वाटत होते. मात्र, पुरस्कार मिळालेल्या यादीत बालगंधर्व, आचार्य अत्रे, केशवराव दाते यासारख्या दिग्गजांची नावे पाहिल्यावर त्यांचाच वारसा आपण चालवीत आहोत. जे काही रंगभूमीसाठी केले त्याची दखल घेतली गेली, असे वाटले आणि पारितोषिक स्वीकारले. 
2  पुण्यातील  ‘गुडलक’च्या  विद्यापीठात आम्ही घडलो.   डॉ. लागू हे आमचे कुलगुरू. इंग्लंडहून शिकून आल्यामुळे शेक्सपिअर, बर्नाड शॉ, हे काय आहेत, त्याचे धडे आम्ही त्यांच्याकडून गिरविले.
3 ‘घाशीराम कोतवाल’मधून फक्त राजकीय विचार दिलेला नाही. जगण्याचे मानवी तत्त्वज्ञान त्या नाटकातून विजय तेंडुलकर यांनी सांगितले.