शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही, शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:56 IST

गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले.

अक्षय चोरगे ।मुंबई : गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले. शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न सोडवायचा असेल, तर कच-याचे वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट आणि पुनर्वापर या गोष्टींवर मुंबईकरांनी भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत अनेक तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी मांडले.मुंबईकरांनी जर कचºयाचे वर्गीकरण केले, तर कचºयाची विल्हेवाट लावणे सोपे होईल. सुक्या कचºयाचा पुनर्वापर अथवा सुक्या कचºयातील वस्तूंचा टाकाऊपासून टिकाऊ अशा धोरणांमध्ये वापर करता येणे शक्य आहे. ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करता येऊ शकते. त्यामुळे अत्यंत कमी कचरा डम्पिंगसाठी न्यावा लागेल. शिवाय कचºयासंबंधीचे प्रश्न सोडविणेदेखील सोपे होईल. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून नागरिकांना ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, अशी हाक देण्यात येते. मात्र, अद्याप अपेक्षेपेक्षा कमी लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. यावरून पालिकेची ही हाक नागरिकांपर्यंत पोहोचते तरी का, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांनी उपस्थित केला केला आहे. पालिकेने यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. कचरा करणा-याला शिक्षा करण्यापेक्षा त्या व्यक्तीने कचरा करू नये, यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मांडले.>कचºयाचेविसर्जन!कचºयाच्या बाबतीत आपले पूर्वज अधिक सूज्ञ होते. कच-यापासून खतनिर्मितीवर ते भर देत होते. आपणही तसेच करायला हवे. शहरात या गोष्टींसाठी जागा कमी आहे. मात्र, घरामध्ये एका बादलीतसुद्धा आपण बायोडिग्रेडेबल कचºयापासून खतनिर्मिती करू शकतो. त्यासाठी आपल्याला पाश्चात्त्य देशांप्रमाणे विविध मशिन्स आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. पारंपरिक पद्धतीने आपण कचºयाची विल्हेवाट लावून खतनिर्मिती करू शकतो.- एल्सी गॅब्रिएल, संचालिका,यंग एनव्हायर्नमेंटलिस्ट प्रोग्रामकचºयाचे वर्गीकरण अत्यंत सोपे आहे. त्यासाठी वेगळे ‘दिव्य’ करण्याची आवश्यकता नाही. मात्र, मुंबईकरांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. प्रत्येक लहान कुटुंबदेखील प्रतिमहिना किमान ३० किलो कच-याची निर्मिती करते. त्यामुळे एवढ्या कच-याची विल्हेवाट लावणे हे त्यांचे काम आहे. आपण कच-याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावू शकलो, तर प्रदूषण रोखण्यात व कमी करण्यात आपल्याला यश मिळेल. कचरा ‘डम्प’ करायला शहरात जागा नाही, अशा वेळी सर्वांनी कच-याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन करायला हवे. - नुसरत खत्री, पर्यावरणवादीमुंबईकरांनी कच-याचे वर्गीकरण करावे, यासाठी प्रशासनाने कडक कायदे करण्यासह जनजागृती करणेही गरजेचे आहे. मुंबईच्या तुलनेने नवी मुंबईत कच-याच्या वर्गीकरणावर जास्त भर दिला जातो. शहरातील कच-याचा आणि सोबतच डम्पिंगचा प्रश्न सहज सोडविण्यासाठी वर्गीकरण करणे उपयुक्त ठरेल.- कल्पना इनामदार, पर्यावरणवादी