शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही, शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:56 IST

गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले.

अक्षय चोरगे ।मुंबई : गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले. शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न सोडवायचा असेल, तर कच-याचे वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट आणि पुनर्वापर या गोष्टींवर मुंबईकरांनी भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत अनेक तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी मांडले.मुंबईकरांनी जर कचºयाचे वर्गीकरण केले, तर कचºयाची विल्हेवाट लावणे सोपे होईल. सुक्या कचºयाचा पुनर्वापर अथवा सुक्या कचºयातील वस्तूंचा टाकाऊपासून टिकाऊ अशा धोरणांमध्ये वापर करता येणे शक्य आहे. ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करता येऊ शकते. त्यामुळे अत्यंत कमी कचरा डम्पिंगसाठी न्यावा लागेल. शिवाय कचºयासंबंधीचे प्रश्न सोडविणेदेखील सोपे होईल. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून नागरिकांना ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, अशी हाक देण्यात येते. मात्र, अद्याप अपेक्षेपेक्षा कमी लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. यावरून पालिकेची ही हाक नागरिकांपर्यंत पोहोचते तरी का, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांनी उपस्थित केला केला आहे. पालिकेने यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. कचरा करणा-याला शिक्षा करण्यापेक्षा त्या व्यक्तीने कचरा करू नये, यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मांडले.>कचºयाचेविसर्जन!कचºयाच्या बाबतीत आपले पूर्वज अधिक सूज्ञ होते. कच-यापासून खतनिर्मितीवर ते भर देत होते. आपणही तसेच करायला हवे. शहरात या गोष्टींसाठी जागा कमी आहे. मात्र, घरामध्ये एका बादलीतसुद्धा आपण बायोडिग्रेडेबल कचºयापासून खतनिर्मिती करू शकतो. त्यासाठी आपल्याला पाश्चात्त्य देशांप्रमाणे विविध मशिन्स आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. पारंपरिक पद्धतीने आपण कचºयाची विल्हेवाट लावून खतनिर्मिती करू शकतो.- एल्सी गॅब्रिएल, संचालिका,यंग एनव्हायर्नमेंटलिस्ट प्रोग्रामकचºयाचे वर्गीकरण अत्यंत सोपे आहे. त्यासाठी वेगळे ‘दिव्य’ करण्याची आवश्यकता नाही. मात्र, मुंबईकरांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. प्रत्येक लहान कुटुंबदेखील प्रतिमहिना किमान ३० किलो कच-याची निर्मिती करते. त्यामुळे एवढ्या कच-याची विल्हेवाट लावणे हे त्यांचे काम आहे. आपण कच-याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावू शकलो, तर प्रदूषण रोखण्यात व कमी करण्यात आपल्याला यश मिळेल. कचरा ‘डम्प’ करायला शहरात जागा नाही, अशा वेळी सर्वांनी कच-याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन करायला हवे. - नुसरत खत्री, पर्यावरणवादीमुंबईकरांनी कच-याचे वर्गीकरण करावे, यासाठी प्रशासनाने कडक कायदे करण्यासह जनजागृती करणेही गरजेचे आहे. मुंबईच्या तुलनेने नवी मुंबईत कच-याच्या वर्गीकरणावर जास्त भर दिला जातो. शहरातील कच-याचा आणि सोबतच डम्पिंगचा प्रश्न सहज सोडविण्यासाठी वर्गीकरण करणे उपयुक्त ठरेल.- कल्पना इनामदार, पर्यावरणवादी