शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

उत्पन्नाचा दाखल दरवर्षी सादर करण्याची गरज नाही

By admin | Updated: July 11, 2014 01:25 IST

मागासवर्गीय गटातील मुलांना शैक्षणिक शुल्काच्या सवलतीसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. प्रवेश घेतेवेळी उत्पन्न जर ४.५ लाखाच्या खाली असेल तर एकदा

नागपूर: मागासवर्गीय गटातील मुलांना शैक्षणिक शुल्काच्या सवलतीसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. प्रवेश घेतेवेळी उत्पन्न जर ४.५ लाखाच्या खाली असेल तर एकदा प्रमाणपत्र दाखल केले तर तेच शेवटपर्यंत ग्राह्य धरले जाईल, असे सामाजिक न्यायखात्याचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय खात्याने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयापैकी हा एक निर्णय असून त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शासनमान्य खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी उत्पन्न मर्यादा ४.५ लाख रुपये आहे. पूर्वी विद्यार्थ्यांने पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर दरवर्षी त्याला उत्पन्नाचा दाखला संबंधित महाविद्यालयात सादर करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती आणि संभ्रमही वाढला होता. आता शासनाने यात सुधारणा केली आहे. प्रवेश घेतेवेळी जर उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत असेल तर पहिल्यावर्षी दाखल केलेला दाखलाच शेवटपर्यंत चालेल, असे मोघे यांनी यावेळी स्पष्ट केले.ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करण्याची मागणी आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी ही मर्यादा सहा लाख रुपयेच आहे. मात्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी ती साडेचार लाख रुपये आहे. ती जर सहा लाख रुपये केली तर त्याचा फायदा गरीब श्ोतकरी व इतर दुर्बल घटकातील नागरिकांना मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ओबीसींना १४०० कोटींचे वाटपइतर मागासवर्गीय व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे दरवर्षी १४०० कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी वाटप केले जाते. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी निधी देणारे महाराष्ट्र हे एक राज्य आहे. केंद्र शासन त्यांच्या वाट्याची रक्कम देत नाही आणि दिली तरी ती अत्यल्प असते. मात्र राज्य शासन स्वत:च्या तिजोरीतून ही रक्कम देते याकडे मोघे यांनी लक्ष वेधले. केंद्राकडे यंदा १०७ कोटी रुपये वाटप करायचे आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात १६६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.