शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन नाही; RTI मधून माहिती उघड

By admin | Updated: June 16, 2017 16:13 IST

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन नसल्याची बाब RTI मधून उघड झाली आहे.

- राजू काळे/ऑनलाईन लोकमत

भार्इंदर, दि. 16- महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला १९६४ च्या राजभाषा अधिनियमानूसार राजभाषेचा दर्जा देण्यात आला. यानंतर या भाषेच्या संशोधनासह त्याच्या विकासासाठी व त्याचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी केंद्र (भाषा भवन) अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर येते आहे. महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने दाखल केलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा जागर करणारे भाषा यावर गप्प का, असा प्रश्नसुद्धा आता उपस्थित केला जातो आहे. 
 
राज्यासह देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. या राजधानीत बहूभाषी समाज वास्तव्यास असल्याने त्यावर सर्वांचाच अधिकार असल्याचा राजकीय दावा केला जात आहे. मुंबई, महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असली तरी सध्याच्या काळात राज्याच्या विविध भागांतही इतर भाषिकांनी आपले संसार थाटल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील या राज्याची भाषा ही मराठीच असून तीच्या अस्तित्वासाठी येथील भूमीपुत्रांनाच झगडावे लागत असल्याचे वेळोवेळी पहायला मिळत आहे. मराठी भाषेला हिन समजणाऱ्यांमुळे तीचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून त्या टिकविण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी बहुतांशी ठिकाणी सरकारकडूनच या भाषेचा अपमान केल्याचे माहिती अधिकारातून अनेकदा दिसून आले आहे. त्यात राज्य सरकारच्या बहुतांशी वेबसाईट हिंदी व इंग्रजी भाषेत असल्याचे उजेडात आले. तसेच राज्यातुन गेलेल्या भारतीय रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच मराठी भाषेला सापत्न वागणूक देत तीच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने माहिती अधिकारातून उजेडात आणून मराठी भाषेचा वापर किमान राज्यातील रेल्वे प्रशासनाच्या कारभारात केला जावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासुन पाठपुरावा करीत आहे. त्याला काही अंशी यश आलं असलं तरी राज्यातील सरकारनेच त्याकडे पाठ फिरविल्याचे वारंवार दिसून आले आहे. राज्यात युतीचे सरकार आहे. त्यात मराठी बाणा जपणाऱ्या शिवसेनेचा समावेश आहे. सतत मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनीच सरकारच्या मराठी भाषा द्वेष्ट्या कारभाराकडे दूर्लक्ष करावे, हे मराठी भाषिकांच्या भावनांकडे दूर्लक्ष करण्यासारखे आहे. सर्वधर्म समभावाप्रमाणे असलेल्या मुंबईसह राज्यात मराठी भाषा संवर्धनाचे केंद्र आहे का, असा प्रश्न समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख राज्याच्या मराठी भाषा विभागाकडे २२ डिसेंबर २०१६ रोजी माहिती अधिकारातून विचारला होता. त्यावर प्राप्त माहितीत ते केंद्र मुंबईच्या धोबीतलाव येथील रंगभवन येथे प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, त्यावर मुंबई वारसा जपवणूक समितीने आक्षेप घेतल्याने केंद्र उभारण्यात आले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र मुंबईत इतर राज्यांचे भवन (केंद्र) असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राज्यातील मराठी भाषा भवनासाठी राज्य सरकारला जागा मिळत नाही, परंतू, परराज्यातील केंद्र उभारण्यासाठी सरकारला जागा कशी काय मिळते, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळूनही गेल्या ५३ वर्षांत केंद्रासाठी जागा मिळू नये, हे आश्चर्यकारक असल्याचे समितीने म्हटले आहे. यावर जागेचा शोध अद्याप घेण्यात येत असल्याचे विभागाकडून दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले असले तरी ही बाब राज्यातील मराठ्यांसाठी अपमानजनक असल्याचे समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी म्हटले आहे.