शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन नाही; RTI मधून माहिती उघड

By admin | Updated: June 16, 2017 16:13 IST

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन नसल्याची बाब RTI मधून उघड झाली आहे.

- राजू काळे/ऑनलाईन लोकमत

भार्इंदर, दि. 16- महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला १९६४ च्या राजभाषा अधिनियमानूसार राजभाषेचा दर्जा देण्यात आला. यानंतर या भाषेच्या संशोधनासह त्याच्या विकासासाठी व त्याचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी केंद्र (भाषा भवन) अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर येते आहे. महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने दाखल केलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा जागर करणारे भाषा यावर गप्प का, असा प्रश्नसुद्धा आता उपस्थित केला जातो आहे. 
 
राज्यासह देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. या राजधानीत बहूभाषी समाज वास्तव्यास असल्याने त्यावर सर्वांचाच अधिकार असल्याचा राजकीय दावा केला जात आहे. मुंबई, महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असली तरी सध्याच्या काळात राज्याच्या विविध भागांतही इतर भाषिकांनी आपले संसार थाटल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील या राज्याची भाषा ही मराठीच असून तीच्या अस्तित्वासाठी येथील भूमीपुत्रांनाच झगडावे लागत असल्याचे वेळोवेळी पहायला मिळत आहे. मराठी भाषेला हिन समजणाऱ्यांमुळे तीचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून त्या टिकविण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी बहुतांशी ठिकाणी सरकारकडूनच या भाषेचा अपमान केल्याचे माहिती अधिकारातून अनेकदा दिसून आले आहे. त्यात राज्य सरकारच्या बहुतांशी वेबसाईट हिंदी व इंग्रजी भाषेत असल्याचे उजेडात आले. तसेच राज्यातुन गेलेल्या भारतीय रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच मराठी भाषेला सापत्न वागणूक देत तीच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने माहिती अधिकारातून उजेडात आणून मराठी भाषेचा वापर किमान राज्यातील रेल्वे प्रशासनाच्या कारभारात केला जावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासुन पाठपुरावा करीत आहे. त्याला काही अंशी यश आलं असलं तरी राज्यातील सरकारनेच त्याकडे पाठ फिरविल्याचे वारंवार दिसून आले आहे. राज्यात युतीचे सरकार आहे. त्यात मराठी बाणा जपणाऱ्या शिवसेनेचा समावेश आहे. सतत मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनीच सरकारच्या मराठी भाषा द्वेष्ट्या कारभाराकडे दूर्लक्ष करावे, हे मराठी भाषिकांच्या भावनांकडे दूर्लक्ष करण्यासारखे आहे. सर्वधर्म समभावाप्रमाणे असलेल्या मुंबईसह राज्यात मराठी भाषा संवर्धनाचे केंद्र आहे का, असा प्रश्न समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख राज्याच्या मराठी भाषा विभागाकडे २२ डिसेंबर २०१६ रोजी माहिती अधिकारातून विचारला होता. त्यावर प्राप्त माहितीत ते केंद्र मुंबईच्या धोबीतलाव येथील रंगभवन येथे प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, त्यावर मुंबई वारसा जपवणूक समितीने आक्षेप घेतल्याने केंद्र उभारण्यात आले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र मुंबईत इतर राज्यांचे भवन (केंद्र) असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राज्यातील मराठी भाषा भवनासाठी राज्य सरकारला जागा मिळत नाही, परंतू, परराज्यातील केंद्र उभारण्यासाठी सरकारला जागा कशी काय मिळते, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळूनही गेल्या ५३ वर्षांत केंद्रासाठी जागा मिळू नये, हे आश्चर्यकारक असल्याचे समितीने म्हटले आहे. यावर जागेचा शोध अद्याप घेण्यात येत असल्याचे विभागाकडून दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले असले तरी ही बाब राज्यातील मराठ्यांसाठी अपमानजनक असल्याचे समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी म्हटले आहे.