शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पहिल्या पाचमध्येही महाराष्ट्र नाही

By admin | Updated: October 11, 2016 05:46 IST

उद्योगपोषक वातावरणासाठी असलेल्या ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’मध्ये देशातील पाच राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही.

मुंबई : उद्योगपोषक वातावरणासाठी असलेल्या ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’मध्ये देशातील पाच राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही. अर्थात ही यादी अंतिम नाही. चालू महिन्याअखेर त्या बाबतचे अंतिम रँकिंग जाहीर होईल, असे राज्याच्या उद्योग विभागाने स्पष्ट केले. ईझ आॅफ डुर्इंग बिझनेसमध्ये देशात पहिले येण्यासाठी राज्याराज्यात सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन’ने (डीआयपीपी) चालू महिन्याअखेर या बाबतचे रँकिंग जाहीर करेल, अशी शक्यता आहे. सध्या तेलंगण आघाडीवर असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि झारखंड असा क्रम आहे. तेलंगणा आणि आंध्र या दोन शेजारी राज्यांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. डीआयपीपीतील रॅँकिंग आठवड्यागणिक बदलत असते. अंतिम रँकिंग हे कोणते राज्य आघाडीवर आहे हे निश्चित करते. विशेषत: स्थानिक नोकरशाही किती प्रभावीपणे काम करते यावर या अभियानाचे यश अवलंबून असते, असा अनुभव आहे. गेल्यावर्षी (२०१५) गुजरात पहिल्या तर आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या खालोखाल झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश असा क्रम होता. गेल्यावर्षी ९६ निकषांवर रँकिंग निश्चित करण्यात आले होते. यंदा तब्बल ३४० निकषांची कसोटी पार करावी लागणार आहे. राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव विजय सिंघल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, डीआयपीपीच्या चांगल्या रँकिंगसाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेतच पण मेक इन इंडियातील अर्धी गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय ही बाब आपल्याकडील उद्योगपोषक वातावरणाची साक्ष देणारीच आहे. उद्योगांच्या परवानग्या कमीतकमी करणे, करप्रणालीमध्ये सुटसुटीतपणा, कामगार कायद्यात सुलभता असे अनेक उपाय यंदा करण्यात आले आहेत. सिंगारपूरच्या नामांकित संस्थेने त्यावर अलिकडेच शिक्कामोर्तब केले आहे. (विशेष प्रतिनिधी)