शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुनर्वसनासाठी जमीन नाही

By admin | Updated: February 28, 2017 05:09 IST

गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे

मुंबई : गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे. ८६३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जमीनच नसल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.राज्य सरकारने १९६५ दरम्यान पवना धरणासाठी संबंधित परिसरातील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. या जमिनीऐवजी त्यांना चार एकर जमीन देण्याचे आश्वासनही राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले. परंतु, १२०६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ३४३ शेतकऱ्यांना चार एकर जमीन दिली. उर्वरित ८६३ प्रकल्पग्रस्त गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. २०१० मध्ये राज्य सरकारने या सर्वांना एक एकर जमीन रेडीरेकनरनुसार ५० टक्के किंमत भरून देण्यासंबंधी अधिसूचना काढली. या अधिसूचनेला मुकुंदराज कावूर व अन्य जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.३४३ जणांना चार एकर जमीन व उर्वरित ८६३ जणांना एक एकर जमीन देऊन राज्य सरकार भेदभाव करू शकत नाही. ८६३ जणांचेही पुनर्वसन त्याच पद्धतीने करावे लागेल. ते कसे करायचे यावर सरकारने तोडगा काढावा, असे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)