शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पुनर्वसनासाठी जमीन नाही

By admin | Updated: February 28, 2017 05:09 IST

गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे

मुंबई : गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे. ८६३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जमीनच नसल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.राज्य सरकारने १९६५ दरम्यान पवना धरणासाठी संबंधित परिसरातील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. या जमिनीऐवजी त्यांना चार एकर जमीन देण्याचे आश्वासनही राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले. परंतु, १२०६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ३४३ शेतकऱ्यांना चार एकर जमीन दिली. उर्वरित ८६३ प्रकल्पग्रस्त गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. २०१० मध्ये राज्य सरकारने या सर्वांना एक एकर जमीन रेडीरेकनरनुसार ५० टक्के किंमत भरून देण्यासंबंधी अधिसूचना काढली. या अधिसूचनेला मुकुंदराज कावूर व अन्य जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.३४३ जणांना चार एकर जमीन व उर्वरित ८६३ जणांना एक एकर जमीन देऊन राज्य सरकार भेदभाव करू शकत नाही. ८६३ जणांचेही पुनर्वसन त्याच पद्धतीने करावे लागेल. ते कसे करायचे यावर सरकारने तोडगा काढावा, असे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)