शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुनर्वसनासाठी जमीन नाही

By admin | Updated: February 28, 2017 05:09 IST

गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे

मुंबई : गेली ४३ वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पवना प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकारने ठेंगा दाखवला आहे. ८६३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जमीनच नसल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.राज्य सरकारने १९६५ दरम्यान पवना धरणासाठी संबंधित परिसरातील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. या जमिनीऐवजी त्यांना चार एकर जमीन देण्याचे आश्वासनही राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले. परंतु, १२०६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ३४३ शेतकऱ्यांना चार एकर जमीन दिली. उर्वरित ८६३ प्रकल्पग्रस्त गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. २०१० मध्ये राज्य सरकारने या सर्वांना एक एकर जमीन रेडीरेकनरनुसार ५० टक्के किंमत भरून देण्यासंबंधी अधिसूचना काढली. या अधिसूचनेला मुकुंदराज कावूर व अन्य जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.३४३ जणांना चार एकर जमीन व उर्वरित ८६३ जणांना एक एकर जमीन देऊन राज्य सरकार भेदभाव करू शकत नाही. ८६३ जणांचेही पुनर्वसन त्याच पद्धतीने करावे लागेल. ते कसे करायचे यावर सरकारने तोडगा काढावा, असे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)