शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

दिव्यात ‘दिवा’च नाही!

By admin | Updated: June 11, 2016 03:53 IST

पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे.

ठाणे : पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे. दिव्यात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ््या वेळेबरोबरच सध्या रात्री-अपरात्रीही वीज पुरवठा तीन ते पाच तासांसाठी खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात शुक्रवारी तब्बल ११ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशी अधिकच संतप्त झाले होते. येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मात्र महावितरणच्या कार्यालयावरच हल्लाबोल करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. पावसाळापूर्व कामे आणि तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत सध्या शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार अथवा संध्याकाळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वसुली कमी होत असल्याचे सांगून याचा सर्वाधिक फटका दिव्यातील रहिवाशांना बसतो आहे. महावितरण जरी यातून अंग काढण्याचा प्रयत्न करीत असली, तरी उकाड्याबरोबरच वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे हैराण होण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. वांरवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम पाण्यावरही होतो आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमीप्रमाणे दोन-तीन तासांत तो सुरळीत होईल, अशी आशा येथील रहिवाशांना होती. परंतु दुपारी तीनपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संतापात भर पडली. एकूणच वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रहिवाशांच्या वतीने नीलेश पाटील यांनी महावितरणला निवेदन देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात विजेची समस्या न सोडविल्यास महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, या संदर्भात महावितरणच्या मुंब्रा कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले शुक्रवारी देखभाल, दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात आली होती, त्यामुळेच वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु सांयकाळी पाच वाजता हा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडीत होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>डोंबिवलीतही रात्रीस खेळ चालेडोंबिवलीतही मंगळवारपासून दररोज रात्री वीजपुरवठी खंडित होत आहे. दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री सात तास, नंतर दिवसा आणि नंतर सलग दोन रात्री सतत वीजपुरठा खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या खेरीज दररोज पाच-दहा मिनिटे असा सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे