शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

दिव्यात ‘दिवा’च नाही!

By admin | Updated: June 11, 2016 03:53 IST

पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे.

ठाणे : पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे. दिव्यात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ््या वेळेबरोबरच सध्या रात्री-अपरात्रीही वीज पुरवठा तीन ते पाच तासांसाठी खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात शुक्रवारी तब्बल ११ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशी अधिकच संतप्त झाले होते. येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मात्र महावितरणच्या कार्यालयावरच हल्लाबोल करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. पावसाळापूर्व कामे आणि तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत सध्या शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार अथवा संध्याकाळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वसुली कमी होत असल्याचे सांगून याचा सर्वाधिक फटका दिव्यातील रहिवाशांना बसतो आहे. महावितरण जरी यातून अंग काढण्याचा प्रयत्न करीत असली, तरी उकाड्याबरोबरच वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे हैराण होण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. वांरवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम पाण्यावरही होतो आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमीप्रमाणे दोन-तीन तासांत तो सुरळीत होईल, अशी आशा येथील रहिवाशांना होती. परंतु दुपारी तीनपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संतापात भर पडली. एकूणच वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रहिवाशांच्या वतीने नीलेश पाटील यांनी महावितरणला निवेदन देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात विजेची समस्या न सोडविल्यास महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, या संदर्भात महावितरणच्या मुंब्रा कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले शुक्रवारी देखभाल, दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात आली होती, त्यामुळेच वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु सांयकाळी पाच वाजता हा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडीत होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>डोंबिवलीतही रात्रीस खेळ चालेडोंबिवलीतही मंगळवारपासून दररोज रात्री वीजपुरवठी खंडित होत आहे. दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री सात तास, नंतर दिवसा आणि नंतर सलग दोन रात्री सतत वीजपुरठा खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या खेरीज दररोज पाच-दहा मिनिटे असा सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे