शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दिव्यात ‘दिवा’च नाही!

By admin | Updated: June 11, 2016 03:53 IST

पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे.

ठाणे : पावसाने अजून हजेरी लावलेली नसताना, उष्म्याचा कहर सुरू असताना ठाण्यात विजेचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे. दिव्यात गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ््या वेळेबरोबरच सध्या रात्री-अपरात्रीही वीज पुरवठा तीन ते पाच तासांसाठी खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात शुक्रवारी तब्बल ११ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशी अधिकच संतप्त झाले होते. येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मात्र महावितरणच्या कार्यालयावरच हल्लाबोल करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. पावसाळापूर्व कामे आणि तांत्रिक बिघाडाचे कारण सांगत सध्या शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. सकाळ, दुपार अथवा संध्याकाळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वसुली कमी होत असल्याचे सांगून याचा सर्वाधिक फटका दिव्यातील रहिवाशांना बसतो आहे. महावितरण जरी यातून अंग काढण्याचा प्रयत्न करीत असली, तरी उकाड्याबरोबरच वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे हैराण होण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. वांरवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम पाण्यावरही होतो आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमीप्रमाणे दोन-तीन तासांत तो सुरळीत होईल, अशी आशा येथील रहिवाशांना होती. परंतु दुपारी तीनपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संतापात भर पडली. एकूणच वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रहिवाशांच्या वतीने नीलेश पाटील यांनी महावितरणला निवेदन देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात विजेची समस्या न सोडविल्यास महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, या संदर्भात महावितरणच्या मुंब्रा कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले शुक्रवारी देखभाल, दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात आली होती, त्यामुळेच वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु सांयकाळी पाच वाजता हा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडीत होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>डोंबिवलीतही रात्रीस खेळ चालेडोंबिवलीतही मंगळवारपासून दररोज रात्री वीजपुरवठी खंडित होत आहे. दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री सात तास, नंतर दिवसा आणि नंतर सलग दोन रात्री सतत वीजपुरठा खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या खेरीज दररोज पाच-दहा मिनिटे असा सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे