शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ नाही

By admin | Updated: June 9, 2016 05:52 IST

महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही

पुणे : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही, असे एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी बुधवारी लोकमत’ला सांगितले. देशातील मेडिकलचे प्रवेश केवळ नीट परीक्षेच्या आधारेच दिले जातील, असा निर्णय झाल्याने महाराष्ट्रासह आणखी काही राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून नीट परीक्षा देणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्र शासनाला याबाबत अध्यादेश काढावा लागला होता. त्यातच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेशही केवळ जेईई परीक्षेच्या आधारेच घेतले जातील, अशी माहिती समोर आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश जेईईच्या आधारे करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. एआयसीटीईकडून पायाभूत सुविधा नसलेल्या आणि विद्यार्थी संख्या कमी असणा-या महाविद्यालयांची तपासणी केली जात आहे. काही संस्थाचालक स्वत:हून महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव सादर करत आहेत. (प्रतिनिधी)>सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई परीक्षेच्या आधारे करणे सध्या शक्य नाही. त्याबाबत एआयसीटीईने कोणताही विचार केलेला नाही. एखादी परीक्षा घेवून त्यानुसारच प्रवेश केले जातील,असे अचानक सांगून चालत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा कालावधी दिला पाहिजे. ’’