शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तूर्तास भारनियमन नाही

By admin | Updated: April 21, 2016 04:58 IST

भीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

मेहरून नाकाडे, रत्नागिरीभीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला असून राज्याला दिवसाला सरासरी १७ हजार ४६४ मेगावॅट वीज लागते. केंद्रीय प्रकल्प, खासगी, महाजनकोच्या प्रकल्पातून दिवसाला सरासरी १९ हजार ०६३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. मेमध्ये मागणी वाढली तरी पुरवठा करण्यास महावितरणला कोणतीही अडचण भासणार नाही.कोयना वीजप्रकल्पात एक हजार ९६० मेगावॅट वीजनिर्मिती होते. सध्या कोयना धरणात २४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. त्यापैकी १५ टीएमसी पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, अशा सूचना ऊर्जा विभागाने केल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी ९ टीएमसी पाणी शिल्लक असून, ३१ मे पर्यंत पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कोयनेच्या प्रकल्प १ व २ मधून ४० मेगावॅट, प्रकल्प ३ मधून १५७ मेगावॅट तर प्रकल्प ४ मधून ५९३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. भविष्यात ही वीजनिर्मिती कमी प्रमाणात होणार आहे. कोयनेखेरीज परळीचा जलविद्युत प्रकल्प जुलैखेरीज बंदच आहे. जलविद्युत प्रकल्पांची क्षमता कमी असली तरी औष्णिक प्रकल्पांनी मात्र महाराष्ट्रातील जनतेला तारले आहे. मुंबई शहरातील बांद्रा ते दहिसरपर्यंत ‘रिलायन्स’ कंपनीकडून तर कुलाबा ते बांद्रापर्यंत ‘बेस्ट’ अशा दोन खासगी कंपनीकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. मुंबईला दोन ते अडीच हजार मेगावॅट लागणारी वीज खासगी कंपनीकडून पुरविण्यात येते. कांजूरमार्ग व दहिसरपासून पुढे उर्वरित संपूर्ण राज्यात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबईव्यतिरिक्त राज्यातून १७,४६३ मेगावॅट विजेची मागणी करण्यात येत असली तरी औष्णिक प्रकल्पांमुळे महावितरणपुढे सध्या तरी कोणतीही अडचण नाही. केंद्रीय वीज प्रकल्पातून ६,३६३ मेगावॅट, खासगी कंपन्यांकडून ५,५०० मेगावॅट, महाजनकोतर्फे ७,२०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. दररोज एकूण १९,०६३ मेगावॅट विजेचा पुरवठा राज्याला होत आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करूनही १,५०० मेगावॅट वीज शिल्लक राहत आहे.चंद्रपूर येथील २१० मेगावॅट वीजनिर्मितीचे दोन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. परंतु ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे दोन संच मात्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून वीजपुरवठा सुरू आहे. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याकरिता अल्पकालीन वीज खरेदीची तरतूद केली आहे. परंतु औष्णिक प्रकल्पातून पुरेसा वीजपुरवठा होत असल्यामुळे वीज खरेदीची गरज भासणार नाही.- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.