शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा नाही

By admin | Updated: July 13, 2017 04:56 IST

शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/ धुळे : शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही. जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर व शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसेल, तेव्हा-तेव्हा शिवसेना आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला की नाही, हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे बुधवारी खान्देश दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत पाळधी ता. धरणगाव येथे शेतकरी संवाद तसेच धरणगाव, पारोळा व धुळे येथे जाहीर सभा झाल्या. त्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, २०१२ ते २०१६पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय आधी जाहीर झाला. नंतर ही मर्यादा मागील वर्षांमध्ये वाढवून २००९पर्यंत करण्यात आली. पण जेव्हा २०१७पर्यंत ही मर्यादा वाढविली जाईल, तेव्हाच सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल.शिवसेनेवर टीका करणाऱ्या अजित पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता असताना शेतकऱ्यांच्या समस्यांचा विसर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेवरून दूर करून कोपऱ्यात टाकले. त्यांचे दिवस संपल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपा नेत्यांचे गोडवे गाणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरदेखील त्यांनी टीकास्त्र सोडले़>...तर मंत्रालयासमोर ढोल बडवू जिल्हा बँका कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविले़ परंतु तरीही कर्जमाफीचा लाभ दिला गेला नाही, तर मंत्रालयासमोर ढोल बडवू, असेही ठाकरे म्हणाले़