शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

By admin | Updated: July 20, 2014 01:47 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.

मुंबई : काँग्रेसचे वा इतर कुठल्याही पक्षाचे आमदार फोडून भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन करू नये, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.भागवत यांची भेट घेतली, तेव्हा हा सल्ला देण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रत्येकी सहा कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला आहे. सूत्रंनी सांगितले की, घोडेबाजाराच्या आरोपापासून वाचण्याचा सल्ला सरसंघचालकांनी शहा यांना दिला. दिल्लीत बहुमताअभावी कुणाचेही सरकार स्थापन करणो शक्य नाही. त्यामुळे तेथे महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणासोबत निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सुचविल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा यशाचा फायदा तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला होणार आहे. दिल्लीत निवडणूक घेतली तर तसाच फायदा होईल. आम आदमी पार्टीबाबत दिल्लीकरांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मतही डॉ.भागवत यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौ:याहून परतल्यानंतर त्यांच्या संमतीने राज्य सरकार स्थापण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आधी म्हटले जात होते. मोदी परदेशातून परतल्याला तीन दिवस उलटले तरी सरकार स्थापण्याच्या हालचाली दिसत नाहीत. याला मुख्य कारण तोडफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापण्यास रा.स्व.संघाने केलेला विरोध असल्याचे म्हटले जात आहे.