शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

By admin | Updated: July 20, 2014 01:47 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.

मुंबई : काँग्रेसचे वा इतर कुठल्याही पक्षाचे आमदार फोडून भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन करू नये, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.भागवत यांची भेट घेतली, तेव्हा हा सल्ला देण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रत्येकी सहा कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला आहे. सूत्रंनी सांगितले की, घोडेबाजाराच्या आरोपापासून वाचण्याचा सल्ला सरसंघचालकांनी शहा यांना दिला. दिल्लीत बहुमताअभावी कुणाचेही सरकार स्थापन करणो शक्य नाही. त्यामुळे तेथे महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणासोबत निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सुचविल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा यशाचा फायदा तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला होणार आहे. दिल्लीत निवडणूक घेतली तर तसाच फायदा होईल. आम आदमी पार्टीबाबत दिल्लीकरांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मतही डॉ.भागवत यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौ:याहून परतल्यानंतर त्यांच्या संमतीने राज्य सरकार स्थापण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आधी म्हटले जात होते. मोदी परदेशातून परतल्याला तीन दिवस उलटले तरी सरकार स्थापण्याच्या हालचाली दिसत नाहीत. याला मुख्य कारण तोडफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापण्यास रा.स्व.संघाने केलेला विरोध असल्याचे म्हटले जात आहे.