शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

अच्छे दिन नव्हे बुरे दिन आलेत - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 20:37 IST

मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींची साडेसहा हजार कोटी रूपयाची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डोळा ठेवण्याचे पाप केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 18 - मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींची साडेसहा हजार कोटी रूपयाची कर्जे  माफ करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डोळा ठेवण्याचे पाप केले आहे.  लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर काळा पैसा आणून पंधरा लाख रूपये जमा करणार असल्याचे स्वप्न दाखवून आत्तापर्यंत पाच पैसे ही जमा केले नाहीत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत महाराष्ट्रातील शेतक-यांवर बुरे दिन आणल्याची खरपूस टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 
मंगळवेढा येथे शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. रामहरी रूपनवर, आ. भारत भालके, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, अर्जुन पाटील, भारत पाटील, रामचंद्र जगताप, बाबुभाई मकानदार, भारत बेदरे, लतीफ तांबोळी, प्रकाश गायकवाड उपस्थित होते. 
धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे दिवास्वप्न दाखविले. परंतु अद्यापपर्यंतही ते पैसे शेतक-यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर आले नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिराश झाला आहे, असे मुंडे यांनी सांगितले. शेतामध्ये पिकलेल्या मालांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पंरतु आत्तापर्यंत कोणतीच आश्वासने या सरकारने पाळली नाहीत. शेतक-यांच्या प्रश्नांची जाण या सरकारला नाही. हे सरकार शेतक-यांची चेष्टा करीत असून जनता पाण्याअभावी, जनावरांच्या चा-याअभावी तडफडत आहे, असे सांगितले.
शहरी भागात निवडणूका सुरु असताना ग्रामीण भागामध्ये त्या आचारसंहितेचा संबंध काय? असा सवाल केला . मोदींनी १००० व ५०० रूपयेच्या नोटेवर बंदी घातली असली तरी हा काळा पैसा कोणाकडे आहे, हेही त्यांना माहीत आहे. देशातील ६० ते ६५ उद्योगपतींनी  कर्ज बुडवली असून त्यांची नावे जाहीर करावी. उद्योगपतींची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेला या नोटा बदलण्यासाठी जो त्रास होत आहे, याबाबत महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. 
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरूणा माळी, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, वसंत मुदगूल, चंद्रकांत घुले, भारत नागणे, विजय खवतोडे, प्रविण खवतोडे, सब्जपरी मकानदार, पांडूरंग नाईकवाडी, संकेत खटके, अनिता नागणे, राजश्री टाकणे, भगिरथी नागणे, सुमन शिंंदे, रेखा जाधव, सुरेखा पवार, पारुबाई जाधव, रेश्मा बेंदरे, राजश्री भगरे, प्रविण हजारे या उमेदवारांसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले.