शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत तूर्त समान वीजदर नाहीच!

By admin | Updated: July 27, 2016 04:56 IST

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्याचे निर्देश उद्याच दिले जातील, असे सांगतानाच किमान १०० युनिटपर्यंत

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्याचे निर्देश उद्याच दिले जातील, असे सांगतानाच किमान १०० युनिटपर्यंत मुंबईकरांना वीजदर समान मिळतील, यासाठी या वर्षभरात प्रयत्न केले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. समान वीजदराबाबत ठोस आश्वासन त्यांनी दिले नाही. विधानसभेत आज ऊर्जा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना, भाजपाच्या आशिष शेलार यांनी या दोन कंपन्या भांडवली खर्च वाढवून दाखवतात व त्यांचे आॅडिट केले जात नाही, त्यामुळे वीजदर वाढीव आकारले जातात. म्हणून या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्यात यावे. बेस्ट, महावितरण यांनी समान वीजदर करण्यास संमती दर्शवली आहे, तर रिलायन्ससारख्या कंपनीने अद्याप सहमती दर्शवली नाही. त्याबाबत आपण फेरविचार करावा, अशी सूचनाही सरकारने त्यांना केली आहे. ज्या कंपन्या तयार आहेत, त्यांनी वीज नियामक आयोगाकडे याबाबत विनंती करावी, तसेच सरकार येत्या वर्षभरात अन्य कंपन्यांबरोबर बोलून किमान १०० युनिटला समान वीजदर राहतील, यासाठी प्रयत्न करील, असेही बावनकुळे यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)भांडवली खर्च किती?टाटा पॉवर आणि रिलायन्स या मुंबईमधील वीज कंपन्या समान वीजदराला नकार देताना भांडवली खर्चाचे प्रमाण आणि त्यामुळे वाढणारे वीजदर याचे कारण देतात. याच पार्श्वभूमीवर टाटा आणि रिलायन्स यांचा भांडवली खर्च नेमका किती आहे व या कंपन्या तो खर्च वाढवून दाखवत आहेत का? त्याचा भुर्दंड वीज ग्राहकांवर टाकत आहेत का? हे तपासण्यासाठी या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, ताळेबंद याची कॅगमार्फत चौकशी करण्यात येईल. वीज ग्राहकांमध्ये नाराजीमुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स, टाटा, महावितरण, बेस्ट या चारही कंपन्यांचे वीजदर वेगवेगळे आहेत. परिणामी मुंबईकर त्रस्त आहेत. एकाच शहरात चार दर असू नयेत, अशी मागणी विविध संघटनांसह ग्राहक संघटनांकडून सरकारकडे करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत ठोस कार्यवाही करत नसल्याने वीज ग्राहकांना वाढत्या वीज बिलांना सामोरे जावे लागत आहे. टाटा आणि रिलायन्सचे वीजदर अधिक आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये या कंपन्यांविषयी नाराजी आहे. या दोन्ही कंपन्या भांडवली खर्च वाढवून दाखवतात. शिवाय त्याचे आॅडिट केले जात नाही. त्यामुळे वाढीव वीजदर आकारले जातात, असे वीज ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे.