शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत तूर्त समान वीजदर नाहीच!

By admin | Updated: July 27, 2016 04:56 IST

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्याचे निर्देश उद्याच दिले जातील, असे सांगतानाच किमान १०० युनिटपर्यंत

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्याचे निर्देश उद्याच दिले जातील, असे सांगतानाच किमान १०० युनिटपर्यंत मुंबईकरांना वीजदर समान मिळतील, यासाठी या वर्षभरात प्रयत्न केले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. समान वीजदराबाबत ठोस आश्वासन त्यांनी दिले नाही. विधानसभेत आज ऊर्जा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना, भाजपाच्या आशिष शेलार यांनी या दोन कंपन्या भांडवली खर्च वाढवून दाखवतात व त्यांचे आॅडिट केले जात नाही, त्यामुळे वीजदर वाढीव आकारले जातात. म्हणून या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग)मार्फत आॅडिट करण्यात यावे. बेस्ट, महावितरण यांनी समान वीजदर करण्यास संमती दर्शवली आहे, तर रिलायन्ससारख्या कंपनीने अद्याप सहमती दर्शवली नाही. त्याबाबत आपण फेरविचार करावा, अशी सूचनाही सरकारने त्यांना केली आहे. ज्या कंपन्या तयार आहेत, त्यांनी वीज नियामक आयोगाकडे याबाबत विनंती करावी, तसेच सरकार येत्या वर्षभरात अन्य कंपन्यांबरोबर बोलून किमान १०० युनिटला समान वीजदर राहतील, यासाठी प्रयत्न करील, असेही बावनकुळे यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)भांडवली खर्च किती?टाटा पॉवर आणि रिलायन्स या मुंबईमधील वीज कंपन्या समान वीजदराला नकार देताना भांडवली खर्चाचे प्रमाण आणि त्यामुळे वाढणारे वीजदर याचे कारण देतात. याच पार्श्वभूमीवर टाटा आणि रिलायन्स यांचा भांडवली खर्च नेमका किती आहे व या कंपन्या तो खर्च वाढवून दाखवत आहेत का? त्याचा भुर्दंड वीज ग्राहकांवर टाकत आहेत का? हे तपासण्यासाठी या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, ताळेबंद याची कॅगमार्फत चौकशी करण्यात येईल. वीज ग्राहकांमध्ये नाराजीमुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स, टाटा, महावितरण, बेस्ट या चारही कंपन्यांचे वीजदर वेगवेगळे आहेत. परिणामी मुंबईकर त्रस्त आहेत. एकाच शहरात चार दर असू नयेत, अशी मागणी विविध संघटनांसह ग्राहक संघटनांकडून सरकारकडे करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत ठोस कार्यवाही करत नसल्याने वीज ग्राहकांना वाढत्या वीज बिलांना सामोरे जावे लागत आहे. टाटा आणि रिलायन्सचे वीजदर अधिक आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये या कंपन्यांविषयी नाराजी आहे. या दोन्ही कंपन्या भांडवली खर्च वाढवून दाखवतात. शिवाय त्याचे आॅडिट केले जात नाही. त्यामुळे वाढीव वीजदर आकारले जातात, असे वीज ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे.