शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनावर नियंत्रण नाही

By admin | Updated: June 11, 2016 01:10 IST

सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या महामंडळात कायम वाद होत गेले.

पुणे : सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या महामंडळात कायम वाद होत गेले. त्यामुळे सामान्य लोकांच्या लेखी महामंडळाची प्रतिमा ही मलिन झाली. वर्षात तीन साहित्य संमेलने भरवणे, एवढेच काम साहित्य महामंडळाचे उरले आहे. गणेशोत्सव व उरसाप्रमाणे ही संमेलने भरवली जात असून, ती संस्कृतीची गरज झाली आहे, अशी टीका महामंडळाच्या आजवरच्या कार्यपद्धतीवर करीत धनदांडगे आणि राजसत्ता यांच्यामुळे संमेलनावर महामंडळाचे नियंत्रण उरले नसल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त डॉ. जोशी यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.डॉ. जोशी म्हणाले, ‘‘शक्यतो दर वर्षी संमेलन घेण्यात यावे, असे महामंडळाच्या घटनेत म्हटले आहे. याचा अर्थ असा नव्हे, की दर वर्षी संमेलन भरवायला हवे. पण, धनदांडगे आणि राजसत्ता यांच्या हितसंबंधांमुळे संमेलने भरवली जात असून, ती पश्चिम महाराष्ट्र व शहरांपुरती राहिली आहेत. ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात करून खाण्याची आपली पद्धत असून, त्यातच आनंद मानला जात आहे. मात्र, ‘दर वर्षी संमेलन नको,’ ही माझी भूमिका आहे; पण माझी एकट्याची भूमिका महामंडळाची असू शकत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. >थोरामोठ्या साहित्यिकांच्या पुण्याईने साहित्य महामंडळ स्थापन झाले. त्यांनी साहित्याशी बांधिलकी जपली. अखंड साहित्यनिष्ठा ठेवल्याने तेव्हाच्या काळात अनुदान नसतानादेखील साहित्य महामंडळाचा कारभार व्यवस्थित सुरू होता. आता संमेलनांचा वाढता भोंदू आणि भोंगळपणा, सेवाभावी कार्यकर्त्यांची वानवा यांमुळे टीकेच्या केंद्रस्थानी साहित्य महामंडळ राहिले आहे.- श्रीपाद जोशी