शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेशी संवाद राहिला नसल्याने सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळ - खा. अशोक चव्हाण

By admin | Updated: April 27, 2017 20:38 IST

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्यानेच विसंवादी राज्य सरकारने जनतेसमोर मगरीचे अश्रू ढाळण्याकरिता संवाद यात्रा

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 27 - राज्यभरात शेतक-यांचा वाढता असंतोष, विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्यानेच विसंवादी राज्य सरकारने जनतेसमोर मगरीचे अश्रू ढाळण्याकरिता संवाद यात्रा काढण्याची घोषणा केली आहे,अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
संवादयात्रा काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ग्रामीण भागाचे आणि शेतक-यांचे प्रश्च समजत नाहीत. सरकारचा लोकांशी संवाद राहिला नाही त्यामुळे सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळ आली आहे. राज्यातील नऊ हजारापेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत पण सरकारने कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त संघर्ष यात्रा काढली. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला राज्यातील शेतक-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे पायाखालची वाळू सरकल्यानेच सरकारने संवादयात्रा काढण्याची घोषणा केली आहे पण राज्यातील जनता विसंवादी सरकारच्या संवादयात्रेला प्रतिसाद देणार नाही.
 
उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला पण राज्यातले भाजप सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही त्यामुळे राज्यभरात सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. तूर खरेदी केंद्र बंद करून सरकारने शेतक-यांना मोठ्या संकटात टाकले आहे. त्यातच रोज निय़म बदलून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. वारंवार शब्द फिरवून आणि तूर खरेदी बंद करून सरकारने शेतक-यांना मरणाच्या दारात उभे केले. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खेरदी केंद्र सुरु राहतील अशी घोषणा केली. मात्र फक्त 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर नोंदणी झालेली तूर खेरदी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून तीन दिवस झाले तरी खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या तुरीची खरेदीही सुरु झाली नाही. या सरकारच्या मंत्र्यामध्ये आणि प्रशासनामध्ये ही संवाद राहिला नाही, हे जनतेशी काय संवाद साधणार ? असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.