शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

एसटीकडे भरपाईसाठी दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 06:34 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या.

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या. या घटनेत एसटीतील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाकडे भरपाईसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे मदत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार आहे. रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५ च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. हा पूल कोसळताच पुरात त्या बस वाहून गेल्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. या घटनेनंतर दहा लाख रुपयांचा विमा व चार लाख रुपयांची नुकसान भरपाई अशी १४ लाख रुपयांची मदत एसटी महामंडळाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. मदत जाहीर होताच स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा हा २९ आणि त्यानंतर ३१ असल्याचे सांगितले गेले. मात्र बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स तिकिटांच्या मशिनमधील नोंदीनुसार चालक वाहक सोडता १८ प्रवासी असल्याची अधिकृत नोंद आहे. तर घटनेपूर्वी बस घाटातून जात असल्याने ट्रायमॅक्सच्या मशिनला रेंज नव्हती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांची नोंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे संपर्क साधलेला नाही. घटनेची भीषणता व संवेदनशीलता लक्षात घेऊन महामंडळाकडे नोंद असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांची भेट घेतली जाईल आणि शहानिशा केला जाणार आहे.