शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

एसटीकडे भरपाईसाठी दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 06:34 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या.

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या. या घटनेत एसटीतील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाकडे भरपाईसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे मदत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार आहे. रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५ च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. हा पूल कोसळताच पुरात त्या बस वाहून गेल्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. या घटनेनंतर दहा लाख रुपयांचा विमा व चार लाख रुपयांची नुकसान भरपाई अशी १४ लाख रुपयांची मदत एसटी महामंडळाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. मदत जाहीर होताच स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा हा २९ आणि त्यानंतर ३१ असल्याचे सांगितले गेले. मात्र बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स तिकिटांच्या मशिनमधील नोंदीनुसार चालक वाहक सोडता १८ प्रवासी असल्याची अधिकृत नोंद आहे. तर घटनेपूर्वी बस घाटातून जात असल्याने ट्रायमॅक्सच्या मशिनला रेंज नव्हती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांची नोंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे संपर्क साधलेला नाही. घटनेची भीषणता व संवेदनशीलता लक्षात घेऊन महामंडळाकडे नोंद असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांची भेट घेतली जाईल आणि शहानिशा केला जाणार आहे.