शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

एसटीकडे भरपाईसाठी दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 06:34 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या.

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या. या घटनेत एसटीतील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाकडे भरपाईसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे मदत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार आहे. रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५ च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. हा पूल कोसळताच पुरात त्या बस वाहून गेल्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. या घटनेनंतर दहा लाख रुपयांचा विमा व चार लाख रुपयांची नुकसान भरपाई अशी १४ लाख रुपयांची मदत एसटी महामंडळाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. मदत जाहीर होताच स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा हा २९ आणि त्यानंतर ३१ असल्याचे सांगितले गेले. मात्र बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स तिकिटांच्या मशिनमधील नोंदीनुसार चालक वाहक सोडता १८ प्रवासी असल्याची अधिकृत नोंद आहे. तर घटनेपूर्वी बस घाटातून जात असल्याने ट्रायमॅक्सच्या मशिनला रेंज नव्हती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांची नोंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे संपर्क साधलेला नाही. घटनेची भीषणता व संवेदनशीलता लक्षात घेऊन महामंडळाकडे नोंद असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांची भेट घेतली जाईल आणि शहानिशा केला जाणार आहे.