शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आबांवर ‘तो’ आरोप नको

By admin | Updated: March 10, 2015 01:59 IST

सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही.

मुंबई : सर्वाधिक काळ जवळपास अकरा वर्षे राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणा-या आर. आर. पाटील यांनी कधी तत्वांशी तडजोड केली नाही. पारदर्शीपणे कारभार केला. पण, शेवटपर्यंत त्यांच्या मनाला एक बोचणी होती. ती म्हणजे २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरों मैं..’ हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले. आबा तसे बोलले याचा कोणताच पुरावा नाही. त्यांनी स्वत: त्याचा इन्कार केला. पण माध्यमांसह सर्वांनीच त्यांच्यावर टीका केली. या आरोपाची बोच त्यांना कायम होती. किमान आता तरी त्या आरोपातून आबांची मुक्तता करा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केले. आर. आर. पाटील यांच्यावरील शोकप्रस्तावावर ते बोलत होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, शिवसेनेचे प्रकाश (बाळा) सावंत, माजी मंत्री जगन्नाथराव जाधव, रमेश पान्या वळवी, भागूजी गाडेपाटील, सुखदेव उईके, रामकिशन दायमा, विश्वनाथराव जाधव आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आबांच्या निधनाने राज्याने संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला. सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या आबांनी कायम सर्वसमान्य जनतेचा विचार केला. संसदीय राजकारणातील सारी आयुधे जनहितासाठी वापरण्यासाठी त्यांची धडपड असे. म्हणूनच संसदेच्या धर्तीवर जेव्हा विधिमंडळात उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्काराची सुरुवात करण्यात आली, तेव्हा त्याचे पहिले मानकरी आबा ठरले. गृहमंत्रीपद सांभाळताना वशील्याशिवाय, पारदर्शक अशी पोलिस भरतीची प्रक्रीया आबांनी राबवली. तंटामुक्ती सारख्या त्यांच्या योजनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर पहिल्या चार महिन्यात तीन विद्यमान आमदार आपल्यातून गेले. त्यात गेली २५ वर्षे अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजविणा-या आबांचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटंीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, पतंगराव कदम, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शरद सोनावणे, अर्जुन खोतकर, अबू आझमी आदी नेत्यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. शोकप्रस्तावानंतर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. (विशेष प्रतिनिधी)