शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बॅँकेमध्ये नोटाबंदीची झळ कायम

By admin | Updated: May 6, 2017 05:20 IST

नोटबंदीच्या दणक्यानंतर सावरणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील सहकारी बॅँकाची परवड अजून सुरुच असून शेतकऱ्यांच्या मित्र

वसंत भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : नोटबंदीच्या दणक्यानंतर सावरणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील सहकारी बॅँकाची परवड अजून सुरुच असून शेतकऱ्यांच्या मित्र ठरणाऱ्या या बॅँकाना पतपुरवठा होत नसल्याने नविन कर्जासाठी बळीराजाला खेटे मारावे लागत आहेत. गत दोन महिन्याच्या काळामध्ये अनेकांनी उसनवाऱ्या करुन जूने कर्ज फेडून नवे मिळेल या आशेने धडपड सुरु केली असली तरी मुळात सहकारी बॅँकाना नोटबंदीची झळ अजूनही बसत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.जिल्ह्यातील सहकारी बॅँकाना मागणीनुसार पैसा पुरवला जात नसल्याने पैशाअभावी बॅँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांची मात्र मोठी परवड झाली आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक एकमेव सामान्य शेतकऱ्यांची आधार आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आपली जुनी सहकारी सोसायटीची देणी नवीन कर्ज मिळेल या आशेवर दागिने तारण ठेवून तर कुणी जवळची बचतीची पूंजी काढून भरणा केला. त्यातून केवळ कुडूस शाखेतच सहा कोटींवर रक्कम भरणा झाली. शेतकऱ्यांची सहकारी सोसायटीची कर्ज संपूर्ण भरली गेली. मात्र, त्या दृष्टीने सहकारी बॅँकाना पतपुरवठा होत नसल्याने शेतकरी बॅँकेत खेटा घालून हातावर हात ठेवून आहेत. गौरूनाथ खिसमतराव या निवृत्त शिक्षकांनी सांगितले की, माझ्या खात्यामध्ये भावाच्या मुलाच्या लग्नासाठी पैसे ठेवले आहेत. लग्न दोन दिवसावर आहे आणि मी चार दिवस फेऱ्या मारूनही माझेच पैसे मला मिळालेले नाहीत. तर शेतकरी वसंत भोईर यांनी दागिने तारण ठेवून सोसायटीचे देणे फेडले असतांना. नवीन सोसायटी मिळेल अशी आशा होती. मात्र गेले दोन महिने होऊनही सोसायटीची पाटी कोरीच आहे. हे असेच चालत राहिले तर एका महिन्यावर आलेला शेतीचा हंगाम वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा बॅँकेवरील विश्वासाला तडाया बाबत एका शेतकऱ्यांनी सांगितले, कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यात जिल्हा बॅँकेतील व्यवहार कधीच एवढे ठप्प झाले नाहीत. हे सरकार जिल्हा बॅँकेची कोंडी करीत आहे. परिणामी शेतकरी, कर्मचारी, बचत गट, शालेय व्यवहार अडकले आहेत. सामान्य माणसाचा जिल्हा बॅँकेवर विश्वास कमी होत आहे. शेतकरी, कामगार यांनी राष्ट्रीय बॅँकेत खाते उघडण्यासाठी पसंती दिली आहे.