शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

मानवी जीवनावर विज्ञानाचा प्रभाव जास्त

By admin | Updated: February 5, 2017 04:11 IST

विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला

- शफी पठाण,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला आहे. त्यामुळे आता विज्ञानकथांंच्या माध्यमातून या क्षेत्रातील नवनवीन बदल वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात शनिवारी त्यांचा व ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, महामंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. विलास चिंतामण देशपांडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते जयंत नारळीकर आणि बाळ ठाकूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव, प्रसंग सांगितले. विज्ञानाच्या आडमार्गाने मी साहित्याच्या क्षेत्रात आलो. बऱ्याच विज्ञानकथा माझ्या नावावर असल्या, तरी मी आजही स्वत:ला या क्षेत्रात नवीन समजतो. आज विज्ञान, साहित्य ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे साहित्याने विज्ञानाला जवळ करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरे सत्कारमूर्ती ठाकूर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मी माझ्या करिअरची सुरुवात कोकणातून केली. निसर्गचित्रांपेक्षा विविध स्वभावगुणांच्या माणसांची चित्रे आयुष्यभर रेखाटली. या कार्यक्रमाचे संचालन दीपाली केळकर, तर आभार डॉ. श्रीपाद जोशी यांनी मानले.