शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवनावर विज्ञानाचा प्रभाव जास्त

By admin | Updated: February 5, 2017 04:11 IST

विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला

- शफी पठाण,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला आहे. त्यामुळे आता विज्ञानकथांंच्या माध्यमातून या क्षेत्रातील नवनवीन बदल वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात शनिवारी त्यांचा व ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, महामंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. विलास चिंतामण देशपांडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते जयंत नारळीकर आणि बाळ ठाकूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव, प्रसंग सांगितले. विज्ञानाच्या आडमार्गाने मी साहित्याच्या क्षेत्रात आलो. बऱ्याच विज्ञानकथा माझ्या नावावर असल्या, तरी मी आजही स्वत:ला या क्षेत्रात नवीन समजतो. आज विज्ञान, साहित्य ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे साहित्याने विज्ञानाला जवळ करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरे सत्कारमूर्ती ठाकूर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मी माझ्या करिअरची सुरुवात कोकणातून केली. निसर्गचित्रांपेक्षा विविध स्वभावगुणांच्या माणसांची चित्रे आयुष्यभर रेखाटली. या कार्यक्रमाचे संचालन दीपाली केळकर, तर आभार डॉ. श्रीपाद जोशी यांनी मानले.