शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

दादरीसारख्या घटना घडवल्या आहेत, आता दंगलीही घडवण्यात येतील - राज ठाकरे

By admin | Updated: October 10, 2015 14:04 IST

दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १० - दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील आणि कदाचित एखादं छोटंस युद्धही घडवलं जाईल असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे. विशेष म्हणजे, डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दिल्लीत एका भाजपा नेत्याला मी हा माझा अंदाज सांगितले नी त्यांचं मत विचारलं त्यावर त्यांनी हे असं होऊ शकतं असं उत्तर दिलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ द्यायलाच नाही पाहिजे अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी मांडली. गुलाम अली हा फार मोठे गायक आहेत यात काही वाद नाहीत, पण पाकिस्तानचे आपले संबंध चांगले नसताना त्यांना बोलवायची काय गरज असा प्रश्नन त्यांनी विचारला. त्या देशामध्ये भारतीय कलाकारांना बोलवतदेखील नाहीत असे सांगत, आपल्याकडे काय कलाकारांची कमी आहे का असे विचारत आयोजकांवरही त्यांनी टीका केली.
कलाकार, खेळाडू, अक्रमसारखे कॉमेंटरी करणारे माजी खेळाडू अशा सगळ्यांना भारताचे रस्ते बंद करायले हवेत असे राज ठाकरे म्हणाले.
कल्याण -डोंबिवली शहरांचा आधीच विचका झालेला अाहे, महापालिकेत कामं होत नाहीयेत, अस असताना त्यात २७ गावांचा समावेश करून काय भलं होणार आहे असा सवाल विचारत या गावांना वेगळचं राहू द्यावे असे ते म्हणाले.