शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ग्लोबल वॉर्मिंग आहेच, पण...

By admin | Updated: July 5, 2015 05:48 IST

गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलेले असताना किनारपट्टीजवळच्या असलेल्या पाकिस्तानात का आली उष्णतेची लाट , का दिसतोय असा ‘ड्रास्टिक’ बदल?

- जी. पी. शर्मा (लेखक स्कायमेट व्हेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट या हवामानविषयक संस्थेत उपाध्यक्ष आहेत.)

गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलेले असताना किनारपट्टीजवळच्या असलेल्या पाकिस्तानात का आली उष्णतेची लाट , का दिसतोय असा ‘ड्रास्टिक’ बदल? का वाढतो आहे पर्यावरणातील असमतोल? जाणून घेऊ थेट स्कायमेटमधील तज्ज्ञांच्या शब्दांत...‘एल निनो’चा प्रभाव या वर्षीच आहे, असे नाही. तो गेल्यावर्षी होता, यावर्षीही आहे आणि पुढील वर्षीही राहील. त्यात बदल झालेला नाही. गतवर्षीच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव होता तेव्हाही चांगला पाऊस पडलाच होता. उलटपक्षी यावर्षी त्याचा प्रभाव कमी झाला आहे. सगळ्या घटनांना ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा ‘क्लायमेट चेंज’ जबाबदार आहे असे म्हणतो, तेव्हा सरसकट असे म्हणता येत नाही. जागतिक तापमानवाढ ही समस्या आहेच. मात्र तत्काळ या घटनांचा त्यांच्याशी संबंध जोडता येत नाही आणि जोडला तरी अभ्यासाअंती निष्कर्ष काढावे लागतात. सरतेशेवटी एवढेच, की ‘नॉट अ‍ॅट आॅल टू क्लायमेट चेंज...’ऐन मान्सूनच्या प्रवासादरम्यान दक्षिण आशियातील वातावरण ढवळून निघाले असून, पाकिस्तानात उष्णतेची लाट येण्यापूर्वी भारतात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शिवाय देशातील मुसळधार पावसानंतर जुलै महिन्यात ठिकठिकाणी उष्णतेचे चटके जाणवू लागले आहेत. वातावरणातील या बदलांना ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची पार्श्वभूमी आहे, असे चटकन म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मान्सूनपूर्व आणि नंतरचे वातावरणीय बदल याआधी समजावून घेणे आवश्यक आहे.हिंदी महासागरात दाखल झालेला मान्सून अंदमान-निकोबारसह केरळमध्ये येण्याचा अंदाज स्कायमेटने व्यवस्थित वर्तविला होता. तो तंतोतंत नसेलही, पण देशात मान्सून दाखल होण्याबाबत संस्थेने वर्तविलेली सरासरी तारीख बरोबर होती. अंदमान-निकोबारनंतर महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील म्हणजे उत्तरेकडील प्रवास वेगाने झाला आणि वेळेआधी मान्सूनने देश व्यापला. अगदी याच कालावधीत पाकिस्तानच्या काही भागात उष्णतेची लाट आली. या उष्णतेच्या लाटेला पश्चिम प्रकोप (वेस्टर्न डेस्टर्बन्स) कारणीभूत होता. एका अर्थाने मान्सूनपूर्व उष्णतेची लाट म्हणून या घटनेला संबोधता येईल. उष्णतेच्या लाटेदरम्यान येथील काही भागांतील कमाल तापमान तब्बल ४५ अंशाच्या घरात गेले आणि त्या उष्णतेच्या लाटेत सुमारे हजारएक जणांचा बळी गेला. हे सर्व का झाले? कारण या काळात येथे मान्सून सक्रिय झाला नव्हता. त्याचवेळी येथे पश्चिमी प्रकोप निर्माण झाल्याने उष्णतेची लाट आली होती. म्हणून पाकिस्तानातील काही भागांचे तापमान वाढले होते. मान्सूनदरम्यान अरबी समुद्रात किंवा गुजरातमध्ये जी स्थिती निर्माण झाली; ती स्थिती येथे निर्माण झाली नाही. मान्सून अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशेने उत्तर भारताकडे सरकला. त्यामुळे झाले असे, की पाकिस्तानच्या दक्षिण भागातील कमाल तापमानात वाढ झाली. आता जुलै महिन्याचा विचार केला तर मान्सून स्लो डाऊन आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिण भारतात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात, तेलंगणामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र त्याचवेळी पहाडी क्षेत्रात पावसाने वेग पकडला आहे. देशाच्या विविध भागांत निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र वातावरणात बदलाव आणत असते. आता नेमके तेच होते आहे.