शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने संभ्रम वाढला

By admin | Updated: July 13, 2017 05:41 IST

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे, पण अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या अथवा तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता प्रवेश घ्यायचा की नाही, याविषयी स्पष्टता नसल्याने गोंधळलेल्या स्थितीत आहेत, पण अनेक महाविद्यालयांत सीनियर्स या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. मुंबई विभागातील अकरावी आॅनलाइन प्रेवश प्रक्रिया पहिल्यापासूनच गोंधळामुळे सतत चर्चेत राहिली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा संकेतस्थळात व्यवस्थित सुरूहोते. दुसरा अर्ज भरताना मात्र, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. रडतखडत अर्ज भरणे पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण त्यानंतर पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. सोमवारी सायंकाळी यादी जाहीर न झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज गेले. यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारची रात्र जागून मंगळवारी सकाळी महाविद्यालय गाठले, पण त्यानंतर, हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे समजले. मग या परिस्थिती प्रवेश न घेतल्यास, दुसऱ्या यादीत नाव येईल का, असा प्रश्न मनात सतावत असल्याने, विद्यार्थी काही प्रमाणात तणावात आहेत. दुसरीकडे प्रवेश घेतल्यास प्रक्रियेतून बाहेर पडू आणि हवे ते महाविद्यालय मिळणार नाही, म्हणून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यांनी प्रवेश न घेतल्यास, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडेल. विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी काही महाविद्यालयांनी हेल्पडेस्क सुरूकेला आहे. सीनियर विद्यार्थी अथवा काही ठिकाणी प्राध्यापक विद्यार्थी आणि पालकांना मदत करत असल्याचे चित्र आहे.>प्रवेशासाठी वेळ वाढविण्याची मागणीअकरावीची पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेश मिळाला की नाही, याची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी जाता आले नाही. आता विद्यार्थ्यांना दोनच दिवस मिळणार. त्यामुळे प्रवेशासाठी वेळ म्हणजेच दिवस वाढवून देण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे, पण गुरुवारी शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन, नंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.