शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

‘इतरांवर’ निर्बंध नाहीत

By admin | Updated: October 20, 2016 05:07 IST

‘निवडणुका होत असलेल्या नगरपालिकांच्या क्षेत्रातच आचारसंहिता राहणार

मुंबई : ‘निवडणुका होत असलेल्या नगरपालिकांच्या क्षेत्रातच आचारसंहिता राहणार असून, त्या जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन विकास कामे करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील,’ असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.आयोगाने आज आचारसंहितेबाबत पत्रक प्रसिद्धीला दिले. त्यात स्पष्ट केले आहे की, निवडणूक होत असलेल्या नगरपालिका, नगर पंचायतींमधील मतदारांना प्रभावित करतील, असे कोणतेही निर्णय शासनाला घेता येणार नाहीत, तसेच नगरपालिका वा नगर पंचायतींमध्ये मतदारांवर प्रभाव टाकतील, अशी कोणतीही कृती किंवा घोषणा त्यांना स्वत:ला वा कुठल्याही महापालिका, जिल्हा परिषदा, मंत्री, आमदार, खासदार यांना करता येणार नाहीत. चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये निवडणूक असेल, तर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता असेल, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. तथापि, त्याचा अर्थ त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिकांच्या माध्यमातून नवीन निर्णय घेता येणार नाहीत, असा होत नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहितेत कोणतीही ढिल दिलेली नाही. काल जाहीर केलेल्या आचारसंहितेबाबत अधिक स्पष्टता यावी, म्हणून आज पत्रक प्रसिद्धीला दिले आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)