शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राज्यात बर्ड फ्लूचे मानवी प्रकरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असतानाच आता इतर राज्यांत बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. पण मुंबई अथवा महाराष्ट्रात बर्ड फ्लू निदर्शनास आलेला नाही. तरीदेखील कच्चे मांस खाऊ नये. अधिकाधिक स्वच्छता राखावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

कोरोनासारख्या आजाराचे थैमान सुरू असतानाच बर्ड फ्लूने डोके वर काढले तर अडचणी आणखी वाढतील, असे तज्ज्ञ व्यक्तींचे म्हणणे आहे. मुळात कोंबड्या आणि बदके यामध्ये हा आजार दिसून येत असून, मुंबईत अद्याप तरी याबाबत काही आढळलेले नाही. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे म्हणणे मांडले जात आहे. दरम्यान, बुधवारी ठाणे येथे १५ बगळे मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण बर्ड फ्लूबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची करडी नजर आहे.

मुंबईत डझनभर कावळ्यांचा मृत्यूn मुंबई : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही, असे सरकार सांगत असले तरीदेखील गेल्या १५ दिवसांपासून चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी परिसरात डझनभर कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.n चेंबूर येथील पर्यावरण रक्षक प्रमोद नाईक यांनी याबाबत सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून येथे कावळ्यांचा मृत्यू होत आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला दिली. 

n तसेच समाज माध्यमावरदेखील माहिती दिली.  मी पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. मात्र कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे? याबाबत काम करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू