शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

पक्षांतर्गत निवडणुका नकोच

By admin | Updated: January 19, 2015 04:48 IST

काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या

मुंबई : काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. निवडणुकीची ही पद्धत बंद करून पूर्वीची नियुक्ती व सक्रिय कार्यकर्त्यांची पद्धत सुरू करण्याची मागणी नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबईत पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी अलीकडेच बैठक घेतली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत बहुतांश नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका थांबविण्याचा आग्रह धरला. पक्षांतर्गत निवडणुकांत अनेकदा जनतेत व पक्षात प्रभाव नसलेली मंडळी निवडून आल्याचे दाखले उपस्थितांनी दिली. अशा पदाधिकाऱ्यांमुळे निवडणुकीत पक्षसंघटनेचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसल्याचा दावाही केला. यावर कार्यकर्त्यांची भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. देशभरातूनच पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याच आग्रहाखातर निवडणूक पद्धतीचा अवलंब केल्याने ती मोडीत काढल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी निवडणुकीऐवजी बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. लोकप्रतिनिधी, प्रस्थापित नेत्यांशी सल्लामसलतीनंतर हायकमांडकडून नावांची अंतिम घोषणा केली जात असे. सहमतीने होणाऱ्या या नियुक्त्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायचा. त्यामुळे पक्ष म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे शक्य होते, असा दावा नियुक्तीसाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी केला. मात्र नियुक्तीची पद्धत ठरावीक लोकांच्या फायद्याची असल्याची ओरड होऊ लागल्याने त्याऐवजी निवडणुका घेण्याचा पर्याय पुढे आला. (प्रतिनिधी)