शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

पक्षांतर्गत निवडणुका नकोच

By admin | Updated: January 19, 2015 04:48 IST

काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या

मुंबई : काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. निवडणुकीची ही पद्धत बंद करून पूर्वीची नियुक्ती व सक्रिय कार्यकर्त्यांची पद्धत सुरू करण्याची मागणी नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबईत पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी अलीकडेच बैठक घेतली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत बहुतांश नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका थांबविण्याचा आग्रह धरला. पक्षांतर्गत निवडणुकांत अनेकदा जनतेत व पक्षात प्रभाव नसलेली मंडळी निवडून आल्याचे दाखले उपस्थितांनी दिली. अशा पदाधिकाऱ्यांमुळे निवडणुकीत पक्षसंघटनेचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसल्याचा दावाही केला. यावर कार्यकर्त्यांची भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. देशभरातूनच पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याच आग्रहाखातर निवडणूक पद्धतीचा अवलंब केल्याने ती मोडीत काढल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी निवडणुकीऐवजी बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. लोकप्रतिनिधी, प्रस्थापित नेत्यांशी सल्लामसलतीनंतर हायकमांडकडून नावांची अंतिम घोषणा केली जात असे. सहमतीने होणाऱ्या या नियुक्त्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायचा. त्यामुळे पक्ष म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे शक्य होते, असा दावा नियुक्तीसाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी केला. मात्र नियुक्तीची पद्धत ठरावीक लोकांच्या फायद्याची असल्याची ओरड होऊ लागल्याने त्याऐवजी निवडणुका घेण्याचा पर्याय पुढे आला. (प्रतिनिधी)