शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुरंतोचे महाराष्ट्रात अनेक थांबे

By admin | Updated: September 9, 2015 00:28 IST

राजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे

- रघुनाथ पांडे,  नवी दिल्लीराजधानी, शताब्दीपेक्षाही सुसाट वेगात विनाथांबा धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची कमालीची मोहिनी रेल्वेप्रवाशांवर असल्याने, ज्या मार्गावर या ट्रेनची लोकप्रियता तुलन्ोने कमी आहे तिथे उत्पन्न वाढीसाठी थांबे देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या १२ आणि महाराष्ट्रातून जा-ये करणाऱ्या १४ दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला. देशभरातील २७ पैकी २३ दुरंतोंच्या उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. पूर्वीचाच वेळ कायम राहावा म्हणून १०० ते ११५ हा पूर्वीचा दरताशी वेग आता वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, लोणावळा, भुसावळ, इगतपुरी, कसारा, बल्लारशा, मनमाड, पनवेल, वसई रोड व रत्नागिरी या ११ स्थानकांवर या मार्गावरून जा-ये करणाऱ्या सर्व दुरंतो थांबत आहेत. दुरंतोच्या लोकप्रियतेचा अभ्यास केल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून रेल्वे बोर्ड व मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. जिथे सध्या टेक्निकल हॉल्ट आहे, अशा ठिकाणी व्यावसायिक थांबा दिला गेला आहे.पुणे - हावडा या ट्रेनसाठी मनमाड, भुसावळ व नागपूर, मुंबई - हावडासाठी इगतपुरी, भुसावळ, नागपूर, बिलासपूर, निजामुद्दीन - पुणेसाठी वसई रोड, लोणावळा, रतलाम व कोटा, नागपूर - मुंबईसाठी कसारा व भुसावळ, पुणे - अहमदाबादसाठी वसईराड, मुंबई - नवी दिल्लीसाठी बडोदा, रतलाम, लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी - मडगाव, चेन्नई - निजामुद्दीनसाठी नागपूर- बल्लारशा, इटारशी, लोकमान्य टिळक टर्मिनस - अलाहाबादसाठी इगतपुरी, भुसावळ, इटारशी, सिकंदराबाद - मुंबईसाठी पुणे, इंदूर - मुंबईसाठी बडोदा, उज्जैन, जयपूर - मुंबईसाठी बडोदा, रतलाम, हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलमसाठी रत्नागिरी, पनवेल, मडगाव या टेक्निकल थांब्यांचा विचार झाला.सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला देशभरात सध्या २७ दुरंतो असून, यापैकी १४ दुरंतो महाराष्ट्राच्या विविध भागांतून जा-ये करतात, तर १२ दुरंतो मुंबईतूनच सुटतात. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील प्रवाशांंना होणार आहे. या सर्वच दुरंतोंना थांबे दिले आहेत.दर्डांकडून प्रभू, सिन्हांचे अभिनंदनदुरंतोची उपयोगिता व ज्या ठिकाणी या ट्रेनला टेक्निकल हॉल्ट दिला आहे, त्या स्थानकांवरून प्रवाशांना चढ-उताराची परवानगी रेल्वेने दिली पाहिजे. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल, अशी मागणी करणारे पत्र ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे व सदानंद गौडा यांना दिले होते. याबाबत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन करणारे पत्र दर्डा यांनी दिले आहे.रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या आणि राज्यातून जा-ये करणाऱ्या दुरंतोंना हा निर्णय एक सप्टेंबरपासून लागू झाला.