शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

By admin | Updated: October 27, 2016 18:01 IST

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७  : मेक इन इंडियाचा नारा देणारे भाजप सरकार फसवे सरकार आहे़ सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत़ राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, जि प अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष बळीराम साठे, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, जि प च्या कृषी समितीचे सभापती आप्पाराव कोरे, महात्मा फुले सूत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प सदस्य जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे ता अध्यक्ष प्रकाश चवरे उपाध्वक्ष हेमंत गरड फेडरेशनचे संचालक भारत गुंड माजी सभापती भारत गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, गट नेते प्रमोद डोके नगरसेवक मुस्ताक शेख, तानाजीराजे खताळ, सज्जन पाटील, काकासाहेब भोसले, सतोष वायचळ, आण्णा फडतरे, संतोष सुरवसे, माजी उपसभापती मानाजी माने, महेश पवार, शशीकांत पार्टील, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर नाही, उद्योग धंदे मोडकळीस आलेले आहेत वेगवेगळ्या योजनाचे अमिश दाखवून सर्व सामान्य जनतेची फसवणुक करणाऱ्या शासनाच्या विरोधात जनतेचा उद्देक झाला तर याला शासन जबाबदार राहील आसा इशारा देत या सरकारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातील पाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना योग्य नियोजन करुन वाटप करत होते परंतू राज्यातील भाजपाचे शासन त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करेल असे वाटत नाही. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास अडचणीत सापडलेला शेतकरी पून्हा संकटात सापडनारआहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करने हे आमचे कतव्य असुन योग्य नियोजन न केल्यास पाण्याच्या प्रश्नासाठी आपण शेतकऱ्यांबरोब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़ आरक्षण देणारे सरकार आता गप्प का...भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणणारे सत्तेत आल्या नंतर मात्र चिड़ीचुप बसले आहेत. त्याच प्रमाणे मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला ही सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला भाव नाही़ दुष्काळात जनतेला सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरुणांना हाताला काम नाही़ त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसच सुरक्षित नसतील तर इतर लोकांना संरक्षण कोण देणार? महिलावरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.