शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

By admin | Updated: October 27, 2016 18:01 IST

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७  : मेक इन इंडियाचा नारा देणारे भाजप सरकार फसवे सरकार आहे़ सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत़ राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, जि प अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष बळीराम साठे, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, जि प च्या कृषी समितीचे सभापती आप्पाराव कोरे, महात्मा फुले सूत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प सदस्य जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे ता अध्यक्ष प्रकाश चवरे उपाध्वक्ष हेमंत गरड फेडरेशनचे संचालक भारत गुंड माजी सभापती भारत गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, गट नेते प्रमोद डोके नगरसेवक मुस्ताक शेख, तानाजीराजे खताळ, सज्जन पाटील, काकासाहेब भोसले, सतोष वायचळ, आण्णा फडतरे, संतोष सुरवसे, माजी उपसभापती मानाजी माने, महेश पवार, शशीकांत पार्टील, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर नाही, उद्योग धंदे मोडकळीस आलेले आहेत वेगवेगळ्या योजनाचे अमिश दाखवून सर्व सामान्य जनतेची फसवणुक करणाऱ्या शासनाच्या विरोधात जनतेचा उद्देक झाला तर याला शासन जबाबदार राहील आसा इशारा देत या सरकारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातील पाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना योग्य नियोजन करुन वाटप करत होते परंतू राज्यातील भाजपाचे शासन त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करेल असे वाटत नाही. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास अडचणीत सापडलेला शेतकरी पून्हा संकटात सापडनारआहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करने हे आमचे कतव्य असुन योग्य नियोजन न केल्यास पाण्याच्या प्रश्नासाठी आपण शेतकऱ्यांबरोब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़ आरक्षण देणारे सरकार आता गप्प का...भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणणारे सत्तेत आल्या नंतर मात्र चिड़ीचुप बसले आहेत. त्याच प्रमाणे मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला ही सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला भाव नाही़ दुष्काळात जनतेला सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरुणांना हाताला काम नाही़ त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसच सुरक्षित नसतील तर इतर लोकांना संरक्षण कोण देणार? महिलावरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.