शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

By admin | Updated: October 27, 2016 18:01 IST

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७  : मेक इन इंडियाचा नारा देणारे भाजप सरकार फसवे सरकार आहे़ सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत़ राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, जि प अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष बळीराम साठे, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, जि प च्या कृषी समितीचे सभापती आप्पाराव कोरे, महात्मा फुले सूत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प सदस्य जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे ता अध्यक्ष प्रकाश चवरे उपाध्वक्ष हेमंत गरड फेडरेशनचे संचालक भारत गुंड माजी सभापती भारत गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, गट नेते प्रमोद डोके नगरसेवक मुस्ताक शेख, तानाजीराजे खताळ, सज्जन पाटील, काकासाहेब भोसले, सतोष वायचळ, आण्णा फडतरे, संतोष सुरवसे, माजी उपसभापती मानाजी माने, महेश पवार, शशीकांत पार्टील, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर नाही, उद्योग धंदे मोडकळीस आलेले आहेत वेगवेगळ्या योजनाचे अमिश दाखवून सर्व सामान्य जनतेची फसवणुक करणाऱ्या शासनाच्या विरोधात जनतेचा उद्देक झाला तर याला शासन जबाबदार राहील आसा इशारा देत या सरकारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातील पाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना योग्य नियोजन करुन वाटप करत होते परंतू राज्यातील भाजपाचे शासन त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करेल असे वाटत नाही. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास अडचणीत सापडलेला शेतकरी पून्हा संकटात सापडनारआहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करने हे आमचे कतव्य असुन योग्य नियोजन न केल्यास पाण्याच्या प्रश्नासाठी आपण शेतकऱ्यांबरोब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़ आरक्षण देणारे सरकार आता गप्प का...भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणणारे सत्तेत आल्या नंतर मात्र चिड़ीचुप बसले आहेत. त्याच प्रमाणे मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला ही सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला भाव नाही़ दुष्काळात जनतेला सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरुणांना हाताला काम नाही़ त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसच सुरक्षित नसतील तर इतर लोकांना संरक्षण कोण देणार? महिलावरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.