शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वेल्डिंग फ्रॅक्चरमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट?

By admin | Updated: May 23, 2014 04:23 IST

नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबई : नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र लोको पायलटने रेल्वे सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या जबाबात हा अपघात वेल्डिंग फ्रॅक्चरमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. ४ मे रोेजी नागोठणे ते रोह्यादरम्यान भिसे खिंडीजवळ या ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या भागात ५ अंशाचा वक्र असून, तेथे ५५ची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने डबे पलटी झाले ते पाहता अतिवेगामुळेच अपघात झाल्याची चर्चा होत होती. त्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही तपास सुरू होता. मात्र अपघाताची चौकशी करताना लोको पायलटचा जबाब रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नोंदवण्यात आला असून, यात अतिवेगामुळे अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागात अपघात घडला त्या ठिकाणी ट्रेन आली असता एक मोठा आवाज झाला आणि ट्रेनचे डबे पलटी झाल्याचे सांगितले; तसेच वेगही नियंत्रित असल्याचे जबाबात म्हटले. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले, आमच्याकडून अपघातग्रस्त गाडीच्या वेगाचीही तपासणी करण्यात आली असता नियमाप्रमाणे त्या भागात गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिवेगामुळे हा अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ३०पेक्षा जास्त साक्षीदारांचा जबाब घेतला असून, यामध्ये रेल्वेचे कर्मचारी, प्रवासी आणि पोलिसांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)