शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

वेल्डिंग फ्रॅक्चरमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट?

By admin | Updated: May 23, 2014 04:23 IST

नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबई : नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र लोको पायलटने रेल्वे सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या जबाबात हा अपघात वेल्डिंग फ्रॅक्चरमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. ४ मे रोेजी नागोठणे ते रोह्यादरम्यान भिसे खिंडीजवळ या ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या भागात ५ अंशाचा वक्र असून, तेथे ५५ची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने डबे पलटी झाले ते पाहता अतिवेगामुळेच अपघात झाल्याची चर्चा होत होती. त्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही तपास सुरू होता. मात्र अपघाताची चौकशी करताना लोको पायलटचा जबाब रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नोंदवण्यात आला असून, यात अतिवेगामुळे अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागात अपघात घडला त्या ठिकाणी ट्रेन आली असता एक मोठा आवाज झाला आणि ट्रेनचे डबे पलटी झाल्याचे सांगितले; तसेच वेगही नियंत्रित असल्याचे जबाबात म्हटले. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले, आमच्याकडून अपघातग्रस्त गाडीच्या वेगाचीही तपासणी करण्यात आली असता नियमाप्रमाणे त्या भागात गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिवेगामुळे हा अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ३०पेक्षा जास्त साक्षीदारांचा जबाब घेतला असून, यामध्ये रेल्वेचे कर्मचारी, प्रवासी आणि पोलिसांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)