शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

...तर प. महाराष्ट्राच्या ताटात काय उरणार?

By admin | Updated: January 15, 2016 01:05 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची मुळात मागणीच कुणी केलेली नाही; विदर्भातील नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहेत; विदर्भ देणे म्हणजे देशाचा तुकडा पाडणे आहे; विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही; पश्चिम महाराष्ट्राशिवाय विदर्भ जगूच शकत नाही, असे गैरसमज हेतूपुरस्सर पसरविले जात आहेत. या लोकांना भडकविणाऱ्या कल्पना आहेत. प्रत्यक्षात मात्र विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही, हे सत्य आहे, असे परखड मत राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी गुरुवारी व्यक्त केले.विदर्भ विकास महासभेतर्फे स्व. नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ‘बाळासाहेब तिरपुडे आणि विदर्भ’ या विषयावर श्रीहरी अणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते.अणे म्हणाले, नागपूर विदर्भातील ८३ संस्थांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे ठराव घेतले आहेत. विदर्भातील अकराही जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशननेही ठराव घेतले आहेत. यावरून सर्वांनाच विदर्भ व्हावा, असे वाटते हे स्पष्ट होते. अ‍ॅड. अणे म्हणाले, आपल्याला विदर्भ राज्य हा रिझल्ट हवा आहे. प्रत्यक्षात स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात बऱ्याच नेत्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जो विदर्भ घेऊन चालतो तोच खरा लीडर आहे. त्यामुळे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे आजही आपल्याला लीडर वाटतात, असेही त्यांनी सांगितले. विकासाची मागणी ही भावनिक असू शकत नाही. केळकर समितीने सिंचनाचा आर्थिक अनुशेष संपला असून भौतिक अनुशेष मात्र कायम असल्याचे ते म्हणाले. आपली गरज काय आहे हे पाहून मागणी करायला हवी असे सांगताना नाशिकराव तिरपुडे यांना वास्तविक विकास हवा होता, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.काँग्रेसचे योगदान मोठे : अ.भा. काँग्रेस समितीने १९२० मध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव घेतला होता. विदर्भाच्या चळवळीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. विदर्भातील काँग्रेस नेते सत्तेत राहून विदर्भाच्या विकासासाठी झटत राहिले. नाशिकराव तिरपुडे पक्षात राहून विदर्भावर बोलायचे. नितीन राऊतही बोलतात. गडचिरोली, चंद्रपूर भागातील काँग्रेसचे आमदारही विदर्भाचा आवाज बुलंद करताना दिसतात, असेही अ‍ॅड. अणे यांनी सांगितले.जनमतच्या मागणीवर ठाम लोकभावना या जनमतातून कळत असतात. वेगळ्या विदर्भासाठी जनमत घेण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत. ५१ टक्के लोकांना विदर्भ नको असेल आम्ही विदर्भाची मागणी सोडून देऊ, असे आव्हानही त्यांनी पुन्हा एकदा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.