शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

मग त्यांनी शिव्याशाप दिले तर काय चुकले?

By admin | Updated: February 1, 2015 01:02 IST

आपल्या नशिबात आलेले भोग मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून वनिताबाईने त्याला शाळेत घातले़ परवा पोलिसांनी शेकडो वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढले़ त्यात वनिताबाईसुद्धा होती़ ती कुठे गेली

तुम्ही पाटी आणि पोळी हिसकावली ! गजानन जानभोरआपल्या नशिबात आलेले भोग मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून वनिताबाईने त्याला शाळेत घातले़ परवा पोलिसांनी शेकडो वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढले़ त्यात वनिताबाईसुद्धा होती़ ती कुठे गेली माहीत नाही. मुलगाही आता शाळेत येत नाही. मायलेकरं कुठेतरी आश्रयाला गेले असतील़ उद्ध्वस्त झालेल्या गंगाजमुनाचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण़. अशा शेकडो वनिता आणि त्यांची मुले आता तेथून निघून गेली आहेत़. वेश्या व्यवसाय हा अनैतिक आणि ती विकृतीच. त्याचे समर्थन करता येत नाही. सुसंस्कृत समाजात त्याला मान्यताही नाही. हा देहव्यापार बंद व्हायलाच हवा. परंतु या वारांगनांना गंगाजमुनातून बाहेर काढताना त्यांच्या निष्पाप मुलांची पाटी-पेन्सिल आपण कायमची हिसकावली, ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ का करीत नाही़? आपल्या आईला या नरकातून बाहेर काढण्यासाठी हीच प्रकाशवाट योग्य आहे, असे मनोमन वाटणारी ही मुले रोज शाळेत जायची़. या अंधाऱ्या कोठडीतील भयाण वास्तव त्यांना अस्वस्थ करायचे. आपण शिकून मोठे होऊ, कामधंद्याला लागू आणि मग आपली आई हा देहव्यापार बंद करेल, असे या मुलांना वाटत असेल आणि त्यासाठी त्यांनी शाळेची वाट धरली असेल तर त्यांना मध्येच थांबवायचे की बोट धरुन पुढे घेऊन जायचे, या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? या दुष्टचक्रातून आपल्या आईला बाहेर काढण्याची एकमेव आशा त्यांना शिक्षणातून दिसू लागली होती़ ही वस्ती तशी बदनाम अन् समाजही तिच्याकडे तुच्छतेनेच बघतो़ शाळेपासून कायमची दुरावलेली ही मुले आता कुठे असतील? या मुलांचे पुढे काय होणार, असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत. यातील काही मुले उद्या गुंड आणि मुली वेश्या झाल्या तर त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी कोण स्वीकारणार? एक गंगाजमुना उद्ध्वस्त करताना आपण अशा असंख्य गंगाजमुनांना जन्म देत आहोत, याचे भान पोलिसांना राहिले नाही. या नरकात कोणतीही स्त्री आनंदाने, आवडीने येत नाही़ छंद म्हणूनही त्या या व्यवसायात आलेल्या नाहीत़ कुणाचा नवरा मेला, कुणाला कुटुंबाने वाऱ्यावर सोडले तर कुणी पोटाची भूक शमविण्यासाठी या दुष्टचक्रात अडकली. या वस्तीतील प्रत्येकीची स्वत:ची ही अशी एक ‘कहानी’ आपण ती कधीच समजून घेत नाही, घ्यावीशीही वाटत नाही.वेश्या व्यवसाय खरच बंद करायचा असेल तर या व्यवसायातील महिलांचे पुनर्वसन, समुपदेशन, त्यांच्या मुलांचे शिक्षण या गोष्टींचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा़ हा व्यवसाय पोलिसी खाक्याने किंवा दडपशाहीने कधीच बंद होणार नाही़. हे जग सोडून आपण दुसऱ्या जगात जायला हवे असे त्यांना स्वत:हून वाटले पाहिजे. पोलिसांच्या कारवाईमुळे हा देहव्यापार खरंच बंद झाला का? नाही! तो अजूनही सुरूच आहे़ फक्त त्याची जागा बदलली आहे आणि ती विखुरली आहे़ वेश्या व्यवसायातील स्त्रीचे पुनर्वसन ही मोठी सामाजिक समस्या आहे. एखादी स्त्री यातून बाहेर पडू इच्छित असेल तर समाज तिला स्वीकारत नाही. १९८४ ची गोष्ट आहे, गंगाजमुनातील एका वारांगनेच्या पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांनी पुढाकार घेतला़ काही मित्रांच्या मदतीने रामभाऊंनी तिला आकाशवाणी चौकातील जुन्या पेट्रोल पंपाजवळ चहाची टपरी टाकून दिली़ पूर्वीपेक्षा दोन पैसे अधिक व सन्मानाने मिळत असल्याने सुरुवातीचे चार-पाच दिवस ती महिला आनंदित होती़. एक दिवस गंगाजमुनातील एक जुना ग्राहक तिथे आला. त्याने तिला ओळखले़. हळूहळू चौकातील लोकही तिच्याकडे तुच्छतेने बघू लागले. तिची चहाची टपरी नंतर ओस पडू लागली़ तिसाव्या दिवशी त्या स्त्रीचे पाय गंगाजमुनाकडे परत वळले़... परवा गंगाजमुनातून विस्थापित झालेल्या वारांगनांनी स्वत:च्या पायावर उभे राहायचे ठरवले तर त्यांचीही अवस्था त्या स्त्री सारखीच होईल़ गंगाजमुनातील मुले किमान शाळेत तरी जायची़ नव्या ठिकाणी तर आता तेही होणार नाही़ जन्मापासून जगण्याची झुंज द्यावी लागणाऱ्या या मुलांचे आयुष्य तसेही करपणार आहे. एकाचवेळी पाटी आणि पोळी हिसकावून घेतलेले हे दुर्दैवी जीव तळतळाट करीत असतील, शिव्याशाप देत असतील तर त्यांचे काय चुकले?