शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

...तर वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवू

By admin | Updated: July 7, 2016 03:15 IST

दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद दोन आंबेडकरी गटांतील आहे, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील वर्षा बंगला मी बुलडोझर

मुंबई : दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद दोन आंबेडकरी गटांतील आहे, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल येथील वर्षा बंगला मी बुलडोझर फिरवून उद्ध्वस्त करीन, असा इशारा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. तसेच आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड आणि अन्य ट्रस्टींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी १५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आंबेडकर भवनचा वाद हा रत्नाकर गायकवाड आणि आंबेडकर बंधू या दोन गटातील आहे, असे सरकारमधील मंत्री खासगीत म्हणत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ही भूमिका जाहीर करावी. मग मीही मुख्यमंत्री पदासाठी माझा फडणवीस यांच्याशी वाद आहे, अशी भूमिका घेईन आणि या वादाचे कारण देत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यास मोकळा असेन, असे धक्कादायक विधान आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत केले.ज्यांच्यावर वैयक्तीक आरोप करता येत नाहीत, ज्या पक्ष, नेते, संघटना यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवून संपवता येत नाही, त्यांच्या चळवळीची केंद्रे उध्वस्त करण्याचे कारस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आखलेले आहे. २५ जूनच्या मध्यरात्री पाडण्यात आलेले दादरचे आंबेडकर भवन त्याच प्रवृत्तीचा भाग आहे, अशी खरमरीत टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली.आंबेडकर भवन पाडताना पालिकेच्या सामान्य नियमांचेही पालन करण्यात आले नाही. वीज मीटर चोरुन नेले, वीज बेकायदा तोडण्यात आली, इमारतीत झोपलेल्या लोकांंना इशारा दिला नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला. यासंदर्भातील सर्व पुरावे मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून दिले. मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर कारवाईचे आदेश दिले. मात्र दोषींवर अद्याप काहीही कारवाइ झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रकार परिषदेपूर्वी महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली. त्यास कॉ. प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, भीमराव बनसोड, कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. भारत पाटणकर, आदी हजर होते. (प्रतिनिधी)१५ जुलैला डाव्या आघाडीचा मोर्चा१५ जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा डाव्या लोकशाही आघाडीतील घटक पक्षांतर्फे काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कोणत्या पक्षाचा नसून लोकांचा मोर्चा असेल, असेही आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.