शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

...तर वेतनवाढ रोखणार

By admin | Updated: June 13, 2016 05:18 IST

कनिष्ठ अधिकारी आाणि कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांना महाग पडणार आहे.

जमीर काझी,

मुंबई- स्वत:ची सेवा ज्येष्ठता, रिवॉर्ड्स आणि पदोन्नतीबाबत आग्रही असताना कनिष्ठ अधिकारी आाणि कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांना महाग पडणार आहे. कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वयंमूल्याकन अहवाल, तसेच वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) वेळेत पूर्ण करणे, त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखण्यात येणार आहे. गृहविभागाने हा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घेतला आहे. ही कामे करण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांना येत्या ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. या डेडलाइनपर्यंत त्यांनी त्यांच्याकडील सर्व अहवालांची पूर्तता केल्याचे शासनाला कळवावे लागणार आहे. जे या प्रशासकीय बाबी पूर्ण करणार नाहीत, त्यांची १ जुलैपासून होणारी वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याचे गृहविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी असलेल्या प्रभारी वरिष्ठ अधिकारी, घटकप्रमुखाने त्याच्या कामांचे मूल्यमापन करून त्याला शेरा देणे गरजेचे असते. अधिकाऱ्यांच्या दर्जाप्रमाणे उपायुक्त /अधीक्षकापासून ते पोलीस महासंचालकापर्यंत पद आणि विभागनिहाय जबाबदारी निश्चित केलेली असते. मात्र, काही आयपीएस अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य सर्व जण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अंमलदारांच्या सर्व्हिस शीट्स वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्याचा फटका पदोन्नती, बदली आणि वेतनवाढीवर होतो. मात्र, या अन्यायाला वाचा फोडणे कठीण होऊन बसते. गृहविभागाकडून वारंवार सूचना देऊनही फारसा बदल झालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे गृहविभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. अहवाल पूर्तता प्रमाणपत्र आयपीएस अधिकाऱ्यांना  संकेत स्थळावर पाठवावे लागणार आहे. ३०२ जणांचे नेतृत्वराज्यातील सव्वादोन लाख पोलिसांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या ३०२ एवढी आहे. टक्केवारीत हे प्रमाण अत्यल्प ठरत असले, तरी खात्याची धुरा आणि कारभार या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चालत असतो. त्यांचे हुकूम कनिष्ठांना बंधनकारक असतात. मात्र, मनमानीमुळे अनेक कनिष्ठांवर अन्याय होतो. आता कठोर धोरणामुळे याला काही अंशी चाप बसणार आहे.